ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

vadachya paravar - अखेर जमलं

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 15, 2019 03:33 PM 2019-02-12T14:15:30+5:30

vadachya paravar - अखेर जमलं

शहर : मुंबई

संत्या -: चला आता आमचं सरकार येणार.

गण्या -: एवढा हुरळून जाऊ नकोस.

संत्या- : कारे, का?

गण्या -: अजून नेतेमंडळींच्या वाटाघाटीच सुरू आहेत, चर्चा बैठका चालू आहेत.

संत्या -: पण आता सर्व ठरल्याचं समजलं.

गण्या -: जे काही ठरलं त्यावर तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते निर्णय घेणार आहेत.

मन्या- ; तेवढं पुरेसं काही.

संत्या -: म्हंजे?

मन्या -: राज्यपालांना सत्ता स्थापनेसाठी आवश्यक संख्याबळ दाखवाव लागेल.

संत्या -: त्यापेक्षा अधिक आमची म्हंजे महाशिवआघाडीची संख्या हाय.

मन्या -: पण राज्यपालांची खात्री पटली पाहिजे.

गण्या -; राजकारणातला गाढा अनुभव असलेले जाणते राजे या सर्वांचे सुत्रधार हायत.

संत्या -: ते सांगतात म्हंजे सरकार स्थापन व्हणार हे नक्की.

गण्या -; मन्या तुला की वाटतं?

मन्या -; आमच्या पक्षाचंच सरकार येणार.

गण्या -: ते कसं आता शक्य हाय?

मन्या -: सहा महिन्यांनंतर पुन्हा निवडणुका व्हतील.

संत्या -: तो वर राष्ट्रपति राजवट राहील, दूसरं कुणी सरकार स्थापन करणार काय असं तुला वाटतंय?

मन्या -: तसं काय, जरी कुणी सत्ता स्थापन केलीच तरी ते फार कल टिकणार न्हायत. त्यामुळे पुन्हा निवडणुका घ्याव्याच लागतील.

गण्या -: तेव्हा तुम्हाला बहुमत मिळालं याची काय गॅरंटी?

मन्या -: त्याची तयारी आमी आतापासूनच करतोय.

संत्या  -: ती कशी काय?

मन्या - ; पक्ष संघटनेची मजबूत बांधणी करणार हायत, आमचे नेते.

संत्या-: धनुष्यबाण सोबत घेऊन आमचंच नुकसान झालय.

गण्या -; लोकांनी तुमच्या महायुतीला बहुमत दिलं व्हतं.

मन्या -; पण ते मुख्यमंत्रीपदासाठी अडून राहयले का.

गण्या -: मग तुम्ही समजून घ्यायला हवं व्हतं.

मन्या -; आमच्या पक्षाने सर्वाधिक जागा मिळाल्या तवा मुख्यमंत्री आमचाच व्हायलाहे म्हणणे गैर हाय काय?

गण्या -; तुमच्या वादात राज्यात संभ्रमाची अवस्था निर्माण झाली त्याचं काय?

संत्या -: बरं झालं त्यामुळे आमच्या सायबांचा हेतु तरी साध्य व्हतोय.

गण्या -; तुमचाच मुख्यमंत्री व्हणार तर.

संत्या -: तेवढच न्हाय तर पाच वर्ष आमचाच मुख्यमंत्री व्हणार.

मन्या -: तो पर्यंत एकत्र व्हायलात तर का?

संत्या -: तुमचे नेते स्वप्नात हायत वाटतं. तुमी स्वप्नाच बघा

गण्या -; निवडणुकीच्या वेळेही अशीच स्वप्न तुमच्या नेत्यांनी रंगवली. काय उपयोग झाला.

संत्या -; आमचं जमलेलं ह्यांना बघवत न्हाय, दुसरं काय?

मन्या -; ते जमवताना नेतेमंडळी धापा टाकाया लागलेत बघ.

संत्या -; चांगलं काय कारायचं असलं तर आधीच त्यासाठी काळजीपूर्वक आखणी करायला हवी. नंतर मतभेद होऊ नयेत.

मागे

सत्ता स्थापन किती म्हत्वाची?
सत्ता स्थापन किती म्हत्वाची?

लोकशाहीमध्ये लोकनियुक्त सरकार स्थापन करणे सर्वांचाच हिताचे असते. महाराष्....

अधिक वाचा

पुढे  

संघर्ष
संघर्ष

संतती लायक असेल तर कमवून ठेवण्याची काहीच गरज नाही, कारण ते स्वतः कमविल्या शि....

Read more