ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनावे - राज्यपाल

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 12, 2019 01:36 PM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यातील प्रत्येक विद्यापीठ उत्कृष्टतेचे केंद्र बनावे - राज्यपाल

शहर : मुंबई

राज्यातील प्रत्येक विद्यापीठातील कुलगुरुंनी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे   उत्कृष्टतेचे केंद्र (Centre of excellence ) बनवावेअसे आवाहन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज केले. राज्यातील विविध कुलगुरुंसमवेत आज राजभवन येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री विनोद तावडेउच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय आणि सर्व विद्यापीठांचे कुलगुरु उपस्थित होते.

 राज्यपाल पुढे म्हणालेराज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी विचार मंथन करून काही ठोस अशा सूचना कराव्यात. उत्तम विद्यार्थी आणि गुणवत्तापुर्ण शिक्षण अशी आपल्या राज्याची ओळख तयार व्हावी. प्राध्यापकांनी अधिक समरसतेने शिक्षण व्यवस्था बळकट करण्यासाठी योगदान द्यावे. नव्या विद्यापीठ कायद्यासंदर्भात काही अडचणी किंवा सुचना असल्यास त्याबद्दलही कुलगुरुंनी शासनाला कळवावे, असेही ते म्हणाले.

उपस्थित कुलगुरुंची ओळख करून दिल्यानंतर राज्यातील उच्च शिक्षणाच्या सद्यस्थिती बद्दल सांगताना श्री. तावडे म्हणालेराज्यात नॅक कडून ’ दर्जा मिळालेल्या महाविद्यालयांची संख्या ही 350 आहे तर 73 महाविद्यालये ही स्वायत्त आहेत. उच्च शिक्षणाच्या गुणवत्ता वाढीसाठी राज्यात महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. विद्यापीठ कायद्यात सन 2017 मध्ये सुधारणा करण्यात आल्या. विद्यार्थी केंद्रीत निर्णयांचा यात समावेश करण्यात आला. राज्यातील कानाकोप-यात शिक्षणाचा प्रसार व्हावा यासाठी  क्लस्टर विद्यापीठ आणि स्वायत्त विद्यापिठांना चालना देण्यात आली.  विद्यार्थ्यांना वेग  वेगळे विषय एकाच वेळी शिकता यावे यासाठी निवड आधारीत विषय असलेले आंतर विषय पद्व्युत्तर अभ्यासक्रम सुरु करण्यात आले. लवकरच पदवी अभ्यासक्रमात ही पद्धती सुरु करण्याचा शासनाचा मानस असल्याचे श्री तावडे यांनी सांगितले.

यावेळीराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.सिद्धार्थ काणेशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.देवानंद शिंदेगोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नामदेव कल्याणकरमहाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.दिलीप म्हैसेकरसंत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.मुरलीधर चांदेकरसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.नितीन करमळकरकवी कुलगुरु संस्कृत विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. श्रीनिवास वराखेडीमुंबई विद्यापीठाचे कुलगुरु तसेच डॉ.होमी भाभा राज्य विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरु डॉ.सुहास पेडणेकरसोलापूर विद्यापीठाच्या कुलगुरु श्रीमती डॉ.मृणालीनी फडणवीस,  स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.उद्धव भोसलेडॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.प्रमोद येवलेमहात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.के.पी.विश्वनाथडॉ.पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.व्ही.एम.भालेमहाराष्ट्र पशु व मत्स्य विज्ञान विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एम.पातुरकरवसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.ए.एस.धवनडॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ.संजय सावंत उपस्थित होते.

यावेळी सर्व विद्यापीठातील कुलगुरुंच्या वतीने राज्यपालांना देवी सरस्वती यांची प्रतिमा भेट म्हणून देण्यात आली.

मागे

अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 
अनुदानित शाळांचे अनुदान केले कमी , शिक्षकांचे आंदोलन सुरूच 

शंभर टक्के अनुदानित शाळांचे वीस टक्के अनुदान केल्याने शिक्षकांमध्ये तीव्....

अधिक वाचा

पुढे  

प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाचा 48 हजारहून अधिक शाळांना लाभ
प्रगत शैक्षणिक कार्यक्रमाचा 48 हजारहून अधिक शाळांना लाभ

 प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत आतापर्यंत एकूण 48 हजार 561 शा....

Read more