ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर सफरचंद विक्रेते

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 16, 2019 01:29 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दहशतवाद्यांच्या टार्गेटवर सफरचंद विक्रेते

शहर : देश

श्रीनगरच्या शोपिया भागातील सिंधु शेरमल परिसरात दहशतवाद्यांनी राजस्थानच्या ट्रक ड्रायव्हरची गोळी मारून हत्या केली. ज्यानंतर दक्षिणी काश्मीर परिसरात दहशतीचं वातावरण निर्माण झालं आहे. स्थानिकांनी या घटनेबाबत निंदा व्यक्त केली आहे.

एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की, ट्रक ड्रायव्हरच्या हत्येप्रकरणी 15 लोकांना चौकशीकरता ताब्यात घेतलं आहे. ही घटना सोमवारी रात्री 8 वाजता घडली आहे. जेव्हा सरफचंदांनी भरलेल्या ट्रकवर अज्ञातांनी हल्ला केला आहे. ड्रायव्हरची हत्या केल्यानंतर त्या ट्रकला आग लावण्यात आली.

ड्रायव्हरला तात्काळ स्थानिक रूग्णालयात दाखल केलं मात्र तेथे त्याला मृत घोषित करण्यात आलं. मृतकाची ओळख राजस्थानमध्ये राहणारा शरीफ उददीन खान अशी झाली आहे. या घटनेनंतर तेथील परिसरातील फळ उत्पादकांमध्ये भीती पसरवली आहे. या घटनेनंतर संपूर्ण स्थिती ही तणावाची असून फळ विक्रेत्यांना टार्गेट केलं जात आहे.

फळ विक्रेत्यांच्या म्हणण्यानुसार देशातील सर्व ठिकाणी सफरचंद पाठवणं ही आमची जबाबदारी आहे. कारण 5 ऑगस्टनंतर अनुच्छेद 370 काढून टाकण्याच्या अगोदरच काही लोकांकडून आधीच काही रक्कम घेतली होती. फळ विक्रेत्यांच म्हणणं आहे की, फळ उत्पादन करणं हे काही अनधिकृत आणि चुकीचं काम नाही आहे. ज्या करता आम्हाला टार्गेट केलं जातं आहे.

काश्मीर खोऱ्यात केंद्र सरकार निर्बंध शिथिल करत असल्यामुळे दिवसेंदिवस जनजीवन पूर्ववत होत आहे. यात व्यापारी, स्थानिक दुकानदार, पर्यटन व्यवसाय आणि वाहतूक व्यवस्था सुरळीत होत आहे. यामुळे संतापलेल्या दहशतवाद्यांवी आता सफरचंद बाग मालकांना, विक्रेत्यांना, ने -आण करणाऱ्या ट्रक चालकांना लक्ष्य करायला सुरूवात केली आहे.

मागे

मोठी बातमी : सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला
मोठी बातमी : सुन्नी वक्फ बोर्डाने आयोध्या वादग्रस्त जमिनीवरील दावा सोडला

आयोध्येतल्या राममंदिर खटल्याबाबत सर्वात मोठी बातमी. या खटल्यात नाट्यमय घड....

अधिक वाचा

पुढे  

पाकिस्तानला  शेजारी देशाचा दे धक्का
पाकिस्तानला शेजारी देशाचा दे धक्का

आर्थिकच्या संकटांशी झुंजणाऱ्या पाकिस्तानच्या नाड्या आवळण्यास सुरुवात झा....

Read more