ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2020 10:30 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कर्नाटक प्रशासनाकडून ८ दिवसात महाराजांचा पुतळा बसवण्याचे आश्वासन

शहर : बेळगाव

छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याच्या प्रकरणानंतर आता कर्नाटक प्रशासनाकडून 8 दिवसात परवानगी देऊन पुतळा बसवण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. 8 दिवसात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला नाही तर 9व्या दिवशी गावकरी पुतळा बसवणार असल्याचा निर्णय पोलीस प्रशासन, सामाजिक संघटना आणि ग्रामस्थांच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.

बेळगावच्या मनगुत्ती गावातील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवण्याचे प्रकरण आता स्थानिक प्रशासनाच्या चांगलेच अंगलट आले आहे. या घटनेनंतर बेळगावसह महाराष्ट्रातील शिवभक्त प्रचंड संतापले होते. रविवारी सकाळपासून राज्याच्या वेगवेगळ्या भागांत कर्नाटक सरकारचा निषेध केला जात आहे. या सगळ्याची दखल घेत आता मनगुत्ती येथील स्थानिक प्रशासनाने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासाठी आठ दिवसांची मुदत देण्याची मागणी केली होती. सर्व कायदेशीर बाबी तपासून पुतळा बसवू, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

कर्नाटकातील या घटनेचे पडसाद महाराष्ट्राच्या विविध भागांमध्ये उमटत आहेत. मुंबईतही शिवसेना भवनाबाहेर आक्रमक निदर्शन करण्यात आले. यावेळी शिवसैनिकांनी कर्नाटक सरकारविरोधात घोषणा देत मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचा पुतळा जाळण्याचा प्रयत्न केला. यावरुन पोलीस आणि आंदोलकांमध्ये झटापट झाल्याचे समजते.

 

मागे

मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन
मुंबईत पकडले १ हजार कोटींचे ड्रग्ज, अफगाणिस्तानातून आलं हेरोईन

नवी मुंबईच्या पोर्टमधून १ हजार कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आलंय. अफग....

अधिक वाचा

पुढे  

'या' राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली १३ पुस्तकं
'या' राज्यपालांनी लॉकडाऊनमध्ये लिहिली १३ पुस्तकं

राज्यपाल हे राज्यातील सर्वोच्च पद असत. त्यामुळे राज्यातील सांस्कृतिक, समाज....

Read more