ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 07:07 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Mumbai Rain | मुंबईकरांनो विनाकारण घराबाहेर पडू नका, मुख्यमंत्र्यांचे आवाहन

शहर : मुंबई

मुंबईसह उपनगरात वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस पडत आहे. मुंबईत अवघ्या 5 तासात 300 मिमी पावसाची नोंद करण्यात आली. तुफान पाऊस आणि वेगवान वाऱ्यामुळे मुंबईत अनेक ठिकाणी झाडांची आणि पार्किंगमधील गाड्यांची पडझड झाली. मुंबईतील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नका, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी आज (5 ऑगस्ट) मुंबई आणि परिसरात सुरू असलेल्या संततधार पावसामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी मुंबई महानगरपालिकेला अधिक सतर्क राहण्याबाबत सूचना केल्या.”

कालपासून जोरदार पाऊस कोसळत असून आजही पावसाने मुंबईला झोडपले. उद्या देखील पावसाचा जोर कायम राहील असे भारतीय हवामान खात्याने कळविले आहे. त्यामुळे नागरिकांनी सावधानता बाळगावी अत्यावश्यक कारणांसाठीच घराबाहेर पडावे,” असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

मुख्यमंत्र्यांनी पालिका आयुक्तांना महापालिका, पोलीस, रेल्वे, आरोग्य यंत्रणा तसेच एनडीआरएफ यांच्या समन्वयाने परिस्थिती हाताळावी. त्याचप्रमाणे नागरिकांना जिथे गैरसोय होते आहे किंवा खंडित वीज पुरवठा, झाडे पडणे, साचलेले पाणी याविषयी तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.”

मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनाही ठिकठिकाणी सुरू असलेलेल्या मेट्रो कामांच्या ठिकाणी अधिक सजग राहून कुठलीही दुर्घटना होणार नाही हे पाहण्यास सांगितले आहे.

मुंबईसह उपनगरात मुसळधार

मुंबईत वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचलं आहे. गेल्या दोन दिवसांपासून मुंबईत पावसाचा जोर पाहायला मिळत आहे. दादर, माटुंगा, सायन, हिंदमाता परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं आहे. हिंदमाता परिसरात गुडघाभर पाणी साचलं आहे.

दहिसर, बोरीवली, मालाड, कांदिवली गोरेगााव अंधेरीमध्ये जोरदार पाऊस झाला. वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवर मुसळधार पावसाचा चांगलाच परिणाम झालेला दिसला.

 

मागे

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान
राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक- पंतप्रधान

राम मंदिर हे राष्ट्रीय एकात्मतेचे प्रतिक आहे.  राम मंदीराची प्रक्रिया राष....

अधिक वाचा

पुढे  

कोल्हापुरात धुवांधार, घरातील सदस्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा
कोल्हापुरात धुवांधार, घरातील सदस्य आणि जनावरांना सुरक्षित ठिकाणी हलवा, जिल्हाधिकाऱ्यांचा इशारा

पावसाचा वाढता जोर पाहता कोल्हापुरात प्रशासन सतर्क झालं आहे. पंचगंगा नदीच्य....

Read more