ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 16, 2021 12:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

विदर्भाला कोरोनाचा विळखा : नागपुरात कारवाई, वर्ध्यात महाविद्यालये बंद

शहर : मुंबई

कोरोनाचा प्रादुर्भाव (Coronavirus,) वाढत असून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. विदर्भात (Vidarbha) कोरोनाचा विळखा पुन्हा घट्ट होताना दिसत आहे. काल नागपुरात (Nagpur) 498 कोरोनाबाधित वाढलेत. शहरात तीन आणि ग्रामीणमध्ये एकाचा कोरोनाने बळी घेतला आहे. महत्वाचं म्हणजे काल 2 हजार सहाशे 35 चाचण्या झाल्या होत्या. यामध्ये 498 पॉझिटीव्ह आले असून त्याचे प्रमाण 18 टक्क्यांपेक्षा जास्त आहे. गेल्या दहा दिवसांपासून नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत चालला असून त्यामुळे प्रशासनाच्याही चिंता वाढल्या आहेत. दरम्यान कोरोनाच्या नियमांचं अजून पालन होत नसल्याचं चित्र शहरात अनेक ठिकाणी दिसून  येत आहे. पालिकेने कारवाईचा बडगा उगारला आहे. (Corona in Vidarbha: Municipal action in Nagpur, colleges closed in Wardha)

अकोला जिल्ह्यात शाळा-महाविद्यालये बंद

नागपुरात कोरोनाचा प्रादुरर्भाव एकीकडे वाढत असताना त्याबाबतच्या नियमांचा विसर पडल्याचे चित्र दिसत आहे. त्यामुळे नियमांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध महापालिकेने  कारवाई अजून तीव्र केली आहे. निर्धारित संख्येपेक्षा अधिक व-हाडी आढळून आल्याने  काल महापालिकेनं विवाह सोहळा असलेल्या परिवारासह मंगल कार्यालयालाही दंड ठोठावला आहे.

नागपूर महानगपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने नरेंद्रनगर येथील तुकाराम सभागृहात झालेल्या लग्न समारंभात निर्धारित संख्येपेक्षा जास्त संख्या लोक असल्याने दहा हजार  रुपयांचा दंड वसूल केला धंतोली झोनच्या उपद्रव शोध पथकानं ही कारवाई केलीय.  तुकाराम सभागृहाचे संचालक व ज्यांच्याकडचे लग्न समारंभ होते त्यांच्याकडून प्रत्येकी 5 हजार रुपये दंड वसूल केला आहे.

 तर वर्धा जिल्ह्यात 28 फेब्रुवारीपर्यंत महाविद्यालये राहणार बंद आहेत. वर्ध्याचे जिल्हाधिकारी प्रेरणा देशभ्रतार यांनी तसा आदेश जारी केला आहे. वर्धा जिल्ह्याची कोरोनाची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता महाविद्यालये बंदचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्ह्यातील सर्व कृषक आणि महाविद्यालये राहणार बंद आहेत.28 फेब्रुवारीनंतर कोरोनाची परिस्थिती लक्षात घेऊन पुढील निर्णय महाविद्यालयाबाबत घेण्यात येईल, असे जिल्हा प्रशासनाने म्हटले आहे.      

मागे

संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट
संजय राठोड राजीनामा देण्याची दाट शक्यता; शिवसेनेत दोन गट

पूजा चव्हाण आत्महत्याप्रकरणात विरोधकांच्या टीकेचा जोर वाढल्यानंतर आता रा....

अधिक वाचा

पुढे  

कोरोनाचा धोका : अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, शाळा-महाविद्यालये बंद
कोरोनाचा धोका : अकोला जिल्ह्यात पुन्हा कडक निर्बंध लागू, शाळा-महाविद्यालये बंद

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव (Outbreak of coronavirus) पुन्हा वाढू लागल्याने अकोला जिल्ह्....

Read more