ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 26, 2020 06:41 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Corona Vaccine | मुंबईकरांनी अनुभवली कोरोनावरील पहिली लस

शहर : मुंबई

खऱ्या अर्थाने आज मुंबईत कोरोना विरोधातील लशीचा अनुभव 'मुंबईकरांनी' घेतला. हो, आजपासून ब्रिटनच्या ऑक्सफर्ड विद्यापीठाने निर्माण केलेल्या लशीच्या मानवी चाचण्याची सुरुवात केइएम रुग्णालयात सुरु झाली आहे. आज पहिल्या दिवशी केवळ तीन जणांना लस टोचली जाणार आहे. येत्या 15 दिवसांत ही मानवी चाचणी पूर्ण करण्यात येणार आहे. या ट्रायलमध्ये 100 स्वयंसेवकांवर ही चाचणी करण्यात येणार आहे. यामध्ये स्वयंसेवकांसोबत गुप्तता पाळण्याबाबत करार करण्यात आला आहे, त्यामुळे त्याचे नाव आणि व्यवसाय याबाबतची कमालीची गुप्तता पाळण्यात आली आहे.काही दिवसापूर्वी या चाचण्यांमध्ये लंडन येथील मानवी चाचण्यांत सहभागी झालेल्या एका व्यक्तीला त्रास झाल्याने ह्या चाचण्या काही काळापुरत्या थांबविण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या आठवड्यापासून या कामास सुरुवात करण्यात आली. आज लस टोचली गेली आहे. ऑक्सफर्ड विद्यापीठाचा भारतातील पुण्याच्या सिरम इन्स्टिट्यूटशी उत्पादन करण्याकरिता करार झाला आहे. त्यामुळे भारतातील या लसीच्या मानवी चाचण्या महाराष्ट्रात काही रुग्णालयात करण्यात येणार आहे. यामध्ये प्रामुख्याने मुबंईत, महापालिकेच्या अखत्यारीतील नायर आणि केइएम रुग्णालयात या चाचण्या करण्यात येणार आहे.

याप्रकरणी, केइएम रुग्णालायचे अधिष्ठाता डॉ. हेमंत देशमुख यांनी एबीपी माझा डिजीटलशी बोलताना सांगितले कि, "आज पहिल्या दिवशी केवळ तीन स्वयंसेवकांना ही लस टोचण्यात येणार आहे. त्यापैकी एकाला लस देऊन झाली आहे. या स्वयंसेवकाच्या ओळखीबाबत गुप्तता पाळण्यात येणार आहे. तसा करार करण्यात आला आहे. जे कुणी पात्र स्वयंसेवक होते त्यांना मानवी चाचणी करण्याकरिता बोलविण्यास आजपासून सुरुवात केली आहे. त्यांना लस दिल्यानंतर सुद्धा एक तास थांबिविले जाते आणि मगच घरी पाठविले जाते. लस टोचणी करता आमचे विविध शाखेचे या कामाशी संबंधित डॉक्टर येथे उपस्थित असतात."ते पुढे असेही म्हणाले कि, "या चाचणीत 100 पैकी 20 जणांना प्लॅसिबो (कोणतेही औषध नसते त्या वाइल्समध्ये ) लस देण्यात येणार आहे. परंतु, हे आम्हालाही माहिती नाही कोणत्या वाइल्स मध्ये प्लॅसिबो लस आहे. फक्त कोडींग नंबर आहे तो त्या स्वयंसेवकाच्या पुढे टाकण्यात येणार आहे. ह्या वाइल्स जेथून आल्या आहेत. तेथूनच अशा प्रकारचे 100 डोस पाठविण्यात आल्या आहे. प्लॅसिबो लस ठेवण्यामागे तुलनात्मक अभ्यास करणे शक्य होते. एक काळानंतर ह्याची सर्वांची चाचणी करण्यात येते. या मानवी चाचणीची सर्व माहिती आम्ही आयसीएमआरला (ICMR) देणार आहोत. ते आणि आम्ही याचा अभ्यास करू. अशा पद्धतीने ट्रायल घेण्याचा अनुभव आमच्या रुग्णालयातील डॉक्टरांना आहे."

ॅस्ट्रॅजेनेका या ब्रिटिश बायोफार्मसुटिकल्स कंपनीने ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या सहकार्याने संशोधन केले आहे. या लसीचा पहिला आणि दुसरा मानवी चाचण्यांचा टप्पा पार पडला होता. या लशीच्या तिसऱ्या टप्प्यास सुरुवात करण्यात आली होती. मात्र, ही लस घेतलेल्या व्यक्तीस या लसीचे दुष्परिणाम जाणवू लागल्याने चाचण्या थांबविण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, तो अडथळा आता दूर झाला आहे.

ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी बनवत असलेल्या कोरोना लसीची दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मानवी चाचण्याकरिता देशातील 10 संस्थांची निवड केली आहे. याकरिता 1600 निरोगी व्यक्तींची निवड करण्यात येणार आहे. भारतातील 10 संस्थांपैकी मुंबईतील केइएम आणि नायर रुग्णालयाची निवड करण्यात आली होती. प्रत्येकी केंद्रावर 100 निरोगी स्वयंसेवकांवर या लसीच्या चाचण्या करण्यात येणार आहे. या स्वयंसेवकात 20 ते 50 वयोगटातील नागरिकांची निवड करण्यात आली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव सुरु झाल्यानंतर दोन-तीन महिन्यानंतर अनेक परदेशी औषधं निर्माण करणाऱ्या कंपन्यांनी लस काढत असल्याचे दावे केले होते. त्यापैकी प्रत्यक्षात काही कंपन्यांनी काम सुरु केले असून पहिल्या टप्प्याच्या चाचण्यांचे निकाल विज्ञान जगतासमोर ठेवले होते, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या मानवी चाचण्यांच्या टप्प्याचे काही कंपन्यांचे कामही सुरु झाले आहे.

मागे

'वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार' : हायकोर्ट
'वेश्याव्यवसाय कायद्यानुसार गुन्हा नाही, महिलांनाही व्यवसाय निवडण्याचा पूर्ण अधिकार' : हायकोर्ट

वेश्या व्यवसाय करणे हा कायद्यानुसार गुन्हा नाही, तसेच प्रत्येक व्यक्तीला त....

अधिक वाचा

पुढे  

प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी,तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल
प्रत्येक भारतीयापर्यंत लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी,तेवढे पैसे आहेत का? अदर पूनावाला यांचा सवाल

प्रत्येक भारतीयापर्यंत कोरोना लस पोहोचवण्याचा खर्च 80 हजार कोटी रुपये आहे, स....

Read more