ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 11, 2021 11:05 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतात गेल्या सात महिन्यात 33,000 टन कोव्हिड-19 कचरा, महाराष्ट्र पहिल्या क्रमांकावर

शहर : देश

भारतात गेल्या सात महिन्यात तब्बल 33 हजार टन कोव्हिड-19 जैव-वैद्यकीय कचरा (COVID-19 Waste) निर्माण झाला आहे. कचरा करण्यामध्ये महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे, महाराष्ट्रातील देशातील सर्वाधिक 3,587 टन कचरा जमा झाला आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रणमंडळाने (Central Pollution Control Board) जारी केलेल्या आकड्यांमधून ही माहिती पुढे आली आहे. पूर्ण देशात ऑक्टोबर या एका महिन्यात तब्बल 5,500 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली आहे.

राज्यांच्या प्रदूषण मंडळांनी दिलेल्या आकड्यांवरुन जून 2020 मध्ये सर्व केंद्र शासित प्रदेशात तब्बल 32,994 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली आहे. ज्याची 198 सामान्य जैव-वैद्यकीय कचऱ्याची विल्हेवाट केंद्रांद्वारे एकत्रिकरण, शोध आणि विल्हेवाट लावली जात आहे.

सर्वाधिक कचरा महाराष्ट्रात

कोव्हिड-19 जैव-वैद्यकीय कचऱ्यात पीपीई कीट, मास्क, बुटांचे कव्हर, हॅण्ड ग्लोव्ह्ज, मानव ऊतक, रक्ताने माखलेल्या वस्तू इत्यादींचा समावेश आहे. डाटानुसार, महाराष्ट्रात जूनमध्ये सात महिन्यात 5,367 टन कोव्हिड-19 कचऱ्याची निर्मिती झाली.

कुठल्या राज्यात किती कचरा?

केरळ – 3,300 टन

गुजरात – 3,086 टन

तामिळनाडु – 2,806 टन

उत्तर प्रदेश – 2,502 टन

दिल्ली – 2,471 टन

पश्चिम बंगाल – 2,095 टन

कर्नाटक – 2,026 टन

सीपीसीबीने मे महिन्यात कोरोना विषाणूसंबंधित जैव वैद्यकीय कचरा जमा करणे आणि इलेक्ट्रॉनिक मॅनिफेस्ट सिस्टमद्वारे डेटा संकलित करण्यासाठी ‘कोव्हिड- 19 बीडब्ल्यूएम मोबाईल अॅप्लिकेशन विकसित केला गेलं. या अॅपच्या माध्यमातून कोव्हिृ-19 कचऱ्याचा शोध घेवून त्याची विल्हेवाट लावण्याचं काम केलं जातं.

 

मागे

Bird Flu | परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार; 6 जिल्ह्यात धोका: मंत्री सुनील केदार
Bird Flu | परभणीत 80 हजार कोंबड्या मारणार; 6 जिल्ह्यात धोका: मंत्री सुनील केदार

परभणीत बर्ड फ्ल्यूमुळे कोंबड्या मेल्याचं आढळून आल्याने परभणीतील 80 हजार को....

अधिक वाचा

पुढे  

दोन BMC आयुक्त हवेच, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख ठाम
दोन BMC आयुक्त हवेच, मुख्यमंत्र्यांच्या स्पष्टोक्तीनंतरही अस्लम शेख ठाम

“मुंबई महानगरपालिकेत दोन आयुक्त ठेवावे, हिच माझी मागणी आहे. मी यावर ठाम आह....

Read more