ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दीपाली सय्यद का बसले आमरण उपोषणाला ?  

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 10, 2019 08:18 PM 2019-02-12T14:15:30+5:30

दीपाली सय्यद का बसले आमरण उपोषणाला ?   

शहर : अहमदनगर

महाराष्ट्रात एकीकडे महापूर आहे म्हणून माणसं चिंताग्रस्त आहेत. तर दुसरीकडे पाणी नाही म्हणून त्रस्त आहेत. आणि ह्याच पाणी प्रश्नावर तोडगा निघत नाही. प्रशासनाचं लक्ष नाही म्हणून मराठी कलाकार रस्त्यावर उतरले आहेत.

नगरमधील 35 गावांच्या पाणी योजनेला मंजूरी देण्याचं आश्वासन लोकसभा निवडणुकीत देऊनही अद्यापही योजना मंजूर न झाल्याने 35 गावातील पाणी प्रश्नावरून अभिनेत्री दीपाली सय्यदने अहमदनगरमध्ये जिल्हा परिषदेच्या प्रांगणात आमरण उपोषण सुरू केल आहे. 9 ऑगस्टपासून हे उपोषण सुरू केल  आहे. ही योजना सुरू व्हावी यासाठी दीपालीने मोठा लढा उभारला आहे. गावकर्‍यांचा पाठींबाही मिळविला आहे. मात्र प्रशासन स्तरावर अजूनही काही सकारात्मक प्रतिक्रिया मिळालेली नाही.

अहमदनगर मधील श्रीगोंदा तालुक्यातील साकलाई उपसा सिंचन योजनेतून 35 गावांचा पाणी प्रश्न सुटणार आहे. गेल्या 20 वर्षापासून ही योजना प्रलंबित आहे. अजूनही कोणत्याही प्रकारची कारवाई ह्या प्रश्नासंदर्भात न झाल्याने उपोषणाला बसत असून हा प्रश्न निकाली लागे पर्यंत उपोषण चालू राहणार आहे असे दीपालीने सांगितले .

मानसी नाईक, सीमा कदम, श्वेता परदेशी, सायली पराडकर यां कलाकारांनीही  उपोषणाला पाठिंबा दिला आहे.

मागे

राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच कोल्हापूर-सांगलीत महापूर
राज्य सरकारच्या नाकर्तेपणामुळेच कोल्हापूर-सांगलीत महापूर

मुसळधार पावसामुळे आलेल्या महापूराच्या पाण्याचा विळखा ६ व्या दिवशीही कोल्....

अधिक वाचा

पुढे  

शिरोळमध्ये अद्याप 15 हजार लोक अडकलेलेच
शिरोळमध्ये अद्याप 15 हजार लोक अडकलेलेच

पाऊस थांबल्याने महापूराने वेढलेल्या कोल्हापूर आणि आलमंट्टीतून पाण्याचा व....

Read more