ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

वरुन पाऊस खालून भूकंप: पालघरवासीयांचे जीवन अत्यव्यस्त

By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 25, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

वरुन पाऊस खालून भूकंप: पालघरवासीयांचे जीवन अत्यव्यस्त

शहर : पालघर

 

एकीकडे गेले काही दिवस पालघर जिल्ह्यात पावसाने थैमान घातले असतानाच काल रात्री 9.45 पासून मध्यरात्री दीड वाजेपर्यंत धुंडलवाडी, दापचरी, तलासरी, बोर्डी, डहाणू , बोईसर, कासा, झाई ते गुजरातच्या उंबरगाव पर्यंतच्या भागाला 7 ते 8 भूकंपाचे धक्के बसल्याने पालघरवासीय धास्तावले आहेत. काही ठिकाणी विज गायब झाली असल्याने स्थानिक रहिवाशी चिंताग्रस्त झाले आहे.

पालघर जिल्ह्यात मध्यरात्री 1 च्या सुमारास 3.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप झाल्याची माहिती आयएमडी ने दिली, तसे पाहिले तर रात्री 9.49 वाजता जिल्ह्यात 2.4 रिश्टर स्केल तीव्रतेचा पहिला धक्का बसला. त्यानंतर 12.33 ला 2.2 रिश्टर त्यानतर 3 मिनिटांनी 1.9 रिश्टर स्केल, 1.03 वाजता 3.8 रिश्टर स्केल, 1.06 ला व 1.12 ला असे 7 ते 8 भूकंपाचे धक्के जाणवले. त्यामुळे अनेक स्थानिक रहिवासी घराबाहेर पडले. पण बाहेरही वीज गायब असल्याने सर्व अस्वस्थ होते.

मागे

शास्त्री, मुखर्जी व उपाध्याय त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार नाही
शास्त्री, मुखर्जी व उपाध्याय त्यांच्या मृत्यूची चौकशी होणार नाही

माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री, भारतीय जनसंघाचे दीनदयाल उपाध्याय व डॉक....

अधिक वाचा

पुढे  

कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान
कोटीची जागा काही लाखात: 'ताज' वर अधिकारी मेहरबान

 मुंबईतील जगप्रसिद्ध 'ताज' हॉटेलने गेली 10 वर्ष मनमानी करून पार्किंग साठ....

Read more