ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: सप्टेंबर 23, 2020 07:34 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा इशारा

शहर : मुंबई

परतीच्या पावसाने मुंबईला चांगलेच झोडपून काढले आहे. काल रात्रीपासून पडणारा पाऊस दिवसभर कोसळत आहे. त्यामुळे सकल भागात पाणी साचले आहे. काही ठिकाणी घरांमध्ये आणि काही रुग्णालयात पाणी शिरले आहे. त्यामुळे नागरिकांसह रुग्णांची एकच तारांबळ उडाली आहे. दरम्यान, रात्रीही अतिवृष्टी होण्याचा हवामान विभागाचा अंदाज आहे. त्यामुळे मुंबईकरांनी घराबाहेर पडू नये, आपला जीव धोक्यात घालू नये, असे आवाहन मुंबई महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.

जोरदार पाऊस कोसळत असल्याने खबरदारी म्हणून मुंबईत पाच एनडीआरएफच्या टीम तैनात करण्यात आल्या आहेत आहे. दरम्यान, झवेरी बाजारमध्ये दागिन्यांच्या दुकानात पाणी साचलंय. त्यामुळे दागिन्यांचं नुकसान झाले आहे. सायन परिसरातही चांगलंच पाणी तुंबलं होतं. सायनमधील गांधी मार्केट परिसरातही मोठ्या प्रमाणात पाणी साचलं. अनेक गाड्या या पाण्यात अडकल्या होत्या. शिवडीमधल्या बीडीडी चाळीतही पावसाचे पाणी शिरले. याठिकाणी घरांमध्ये पाणीच पाणी झाले होते. गाड्या देखील पाण्यात असल्याचं पाहायला मिळाले. यावरुन विरोधकांनी मंत्री आदित्य ठाकरे यांना टार्गेट केले. त्यानंतर शिवसेनेकडून उत्तर देण्यात आलेय.

मुंबईत ३०० मिमी पाऊस झाला तर पाणी साठणार नाही का, असा सवाल सत्ताधाऱ्यांनी उपस्थित केला आहे. तर विरोधकांचे काम टीका करणे आहे, असा टोला शिवसेनेने विरोधकांना लगावला आहे. मागील ४० वर्षांपासून मुंबईत १०० मिमी पाऊस झाला तरी काही भागात पाणी साठतेच, असे सत्ताधाऱ्यांनी म्हणत विरोधकांचे आरोप फेटाळलेत.

 

मागे

आठच्या हजेरीसाठी पहाटे चारपासून बससाठी रांगा, वसई-विरारच्या नोकरदारांचे हाल सुरुच
आठच्या हजेरीसाठी पहाटे चारपासून बससाठी रांगा, वसई-विरारच्या नोकरदारांचे हाल सुरुच

लोकल सेवेअभावी वसई-विरार-नालासोपारा परिसरातील चाकरमान्यांचे हाल सुरु आहे....

अधिक वाचा

पुढे  

समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन, कंत्राटदाराला २ अब्ज ४२ कोटींचा दंड
समृद्धी महामार्गासाठी अवैध उत्खनन, कंत्राटदाराला २ अब्ज ४२ कोटींचा दंड

जिल्ह्यात समृद्धी महामार्गाचे काम करणाऱ्या कंपनीच्या कंत्राटदाराला जालन....

Read more