ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 21, 2021 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

चालकाने मास्क न घातल्यास रिक्षा होणार जप्त; प्रशासनाचा मोठा निर्णय

शहर : औरंगाबाद

कोरोनाच्या (Coronavirus) वाढत्या धोक्याच्या पार्श्वभूमीवर औरंगाबादमध्ये पोलीस प्रशासनाने मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार आता औरंगाबाद शहरात रिक्षाचालक विनामास्क वाहन चालवताना आढळला तर त्याची रिक्षा (Autrikshaw) जप्त केली जाईल. या निर्णयाचे मोठे पडसाद उमटण्याची शक्यता आहे. (If auto rickshaw driver not wearing masks auto will be seized by police)

औरंगाबादमध्ये तब्बल 35 हजारांपेक्षा जास्त रिक्षाचालक असून ते दररोज प्रवाश्यांना घेऊन शहरातील गल्लोगल्ली आणि इतरत्र फिरत असतात. त्यांनी मास्क न परिधान केल्यास कोरोनाचा मोठ्याप्रमाणावर प्रसार होण्याची शक्यता आहे. यापूर्वी पोलीस आणि महानगरपालिका प्रशासनाकडून लोकांना वारंवार मास्क घालण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. मात्र, लोक या सूचना गांभीर्याने घेताना दिसत नाहीत. त्यामुळे आता पोलीस प्रशासनाने संबंधितांवर कठोर कारवाई करण्याचा निर्णय घेतला आहे. याचाच एक भाग म्हणून आता रिक्षाचालकांवर कारवाई केली जात असल्याची माहिती औरंगाबादचे पोलीस आयुक्त डॉ. निखील गुप्ता यांनी दिली.

होम आयसोलेशन पर्याय आता बंद

कोरोना बाधितांची वाढती रुग्ण संख्या लक्षात घेता औरंगाबाद महानगरपालिकेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. कोरोनाबाधितांची संख्या ही आता दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. अनेक कोरोना रुग्णांच्या घरातील लोकांनाही व्हायरसची लागण झाल्याचे आढळून आले आहे.

त्यामुळे आता महानगरपालिकेच्या वतीने होम आयसोलेशन पर्याय बंद करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे.

आयसोलेशनच्या ऐवजी बाधितांना कोविड केअर सेंटर किंवा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे लागेल. शहरातील कोरोना बाधितांची संख्या ही दहा टक्क्यांनी वाढत चाललेली आहे. तसेच आगामी काळामध्ये देखील रुग्ण वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे हा बचावाचा उपाय म्हणून महानगरपालिकेने पाऊल उचलले आहे.

मागे

मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?
मुंबईसह महाराष्ट्रासाठी पुढचे 15 दिवस महत्वाचे, रुग्ण वाढले तर लॉकडाऊन अटळ?

राज्यात आणि मुंबईत कोरोना रुग्ण वाढत असल्याने प्रशासनाने विशेष लक्ष घातलं ....

अधिक वाचा

पुढे  

CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे
CM उद्धव ठाकरे यांनी दिली 8 दिवसांची मुदत; जनता संवादातील हे आहेत महत्वाचे मुद्दे

कोरोनाला (Coronavirus) रोखायचे आहे. मास्क घाला, शिस्त पाळा आणि लॉकडाऊन टाळा, असे स्पष....

Read more