ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: ऑगस्ट 08, 2020 05:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

कर्नाटक सरकारने छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा हटवला; शिवभक्तांमध्ये संतापाची लाट

शहर : बेळगाव

सीमाभागातील मराठी भाषिकांना नेहमी गळचेपी करणाऱ्या कर्नाटक सरकारच्या कृतीमुळे बेळगावातील मराठी भाषिकांमध्ये सध्या संतापाची लाट उसळली आहे. येथील मनगुत्ती गावात असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा सरकारने रातोरात हटवला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील शिवप्रेमी प्रचंड संतापले आहेत. कर्नाटक सरकारच्या या कारवाईचा निषेध करण्यासाठी महाराष्ट्रातील शिवभक्त रविवारी कर्नाटकात जाऊन आंदोलन करणार आहेत.

मनगुत्ती गावात शिवाजी महाराजांचा पुर्णाकृती पुतळा बसवण्यात आला होता. स्थानिक ग्रामपंचायतीनेही यासाठी आवश्यक परवानगी दिली होती. मात्र, गावातील एका गटाचा या पुतळ्याला विरोधा होता. त्यामुळे पोलीस पुतळा हटवण्यासाठी आग्रही होते. अखेर मनगुत्ती गावातील मराठी भाषिक रस्त्यावर उतरल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी नरमाईचे धोरण स्वीकारले होते. त्यामुळे हा वाद शमला, असे वाटत होते. मात्र, यानंतरही कर्नाटक सरकारने रातोरात हा पुतळा हटवला. गावात कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करून हा पुतळा हटवण्यात आला. त्यामुळे शिवप्रेमींमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या घटनेमुळे सध्या परिसरात तणावाचे वातावरण आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे कर्नाटक सरकारला वावडे का?, असा सवाल आता उपस्थित करण्यात येत आहे.

दरम्यान, कर्नाटक सरकारने शिवाजी महाराजांचा हटवलेला पुतळा त्वरित उभा करावा. अन्यथा महाराष्ट्रातील शिवभक्त कर्नाटकात घुसतील, अशा इशारा देण्यात आला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातल्या नूल गावातल्या गावकऱ्यांनी हा इशारा दिला आहे.

मागे

केरळमधील विमान दुर्घटना 'टेबलटॉप रनवे'मुळे झाल्याचा अंदाज; म्हणजे काय?
केरळमधील विमान दुर्घटना 'टेबलटॉप रनवे'मुळे झाल्याचा अंदाज; म्हणजे काय?

केरळच्या कोझीकोडमध्ये एअर इंडियाचं एक विमान कोसळलं आहे. या दुर्घटनेत विमान....

अधिक वाचा

पुढे  

केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह
केरळ विमान दुर्घटनेत कोरोनाची एन्ट्री, मृतांमध्ये दोन प्रवाशी पॉझिटिव्ह

केरळमधील कोझिकोड एअरपोर्टवर एअर इंडिया एक्सप्रेस विमानाचा अपघात झाला. धक्....

Read more