ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 26, 2020 11:08 AM 2019-02-12T14:15:30+5:30

‘शेतकऱ्यांच्या समस्या सोडवण्याऐवजी पंतप्रधान टीव्हीवर भाषणबाजी करताहेत’, ममता बॅनर्जींचा घणाघात

शहर : देश

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर सडकून टीका केली आहे. पश्चिम बंगालच्या शेतकऱ्यांना पीएम किसान सम्मान निधी योजनेचे पैसे दिले जात नसल्याचा आरोप पंतप्रधान मोदींनी केला होता. या आरोपांना मतात बॅनर्जी यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. “कृषी कायद्यांविरोधात सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला मिटवण्याऐवजी मोदी लोकांची दिशाभूल करत आहेत. ते बंगालची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत, अशा शब्दात ममता बॅनर्जींनी पलटवार केला (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

नवे कृषी कायदे रद्द करण्यासाठी देशभरातील लाखो शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत. हे कायदे शेतकरी विरोधी आहेत. कारण ते एमएसपी, राज्य खरेदी प्रणाली आणि संरक्षक यंत्रणा काढून टाकण्याची मागणी करतात. पंतप्रधान शेतकऱ्यांचे विषय सोडवण्याऐवजी टीव्हीवर चिंता व्यक्त करत आहेत, असा टोला त्यांनी लगावला.

त्यांनी पंतप्रधान किसान योजनेच्या माध्यमातून पश्चिम बंगालमधील शेतकऱ्यांना मदत करण्याचा इरादा जाहीरपणे व्यक्त केला आहे. दुसरीकडे त्यांनी राज्य सरकार सहकार्य करत नसल्याचा आरोप केला आहे. ते अर्धवट माहिती आणि विकृत तथ्य सांगून लोकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे, असं मत ममता यांनी मांडली.

मी शेतकऱ्यांच्या हितासाठी सहकार्य करण्यास तयार आहे. मी स्वतः त्यांना दोनवेळा पत्र लिहिलं आहे. दोन दिवसांपूर्वी संबंधित मंत्र्यांशी बोलले आहे, पण राजकीय फायद्यासाठी ते सहकार्य करण्यास नकार देत आहेत. दुसरीकडे चुकीचा प्रसार करत आहेत, असं ममता म्हणाल्या (Mamta Banerjee slams PM Narendra Modi).

भाजपच्या नेतृत्वातील केंद्र सरकार नियमांचं उल्लंघन करुन राजकारण करत आहे. केंद्र सरकारने बंगालच्या मदतीसाठी काहीच केलं नाही. जीएसटीचे आतापर्यंतची साडेआठ हजार कोटी रुपयांचे पैसे दिलेले नाहीत. केंद्र सरकारने राज्यांना निदान त्यांच्या हक्काचा निधी द्यायला हवा जेणेकरुन राज्यांमधील सुविधांसाठी तो पैसा वापरता येईल. त्यांनी पैसे दिले तर बंगालच्या लोकांसाठी सगळं करु जे केंद्र सरकार “, अशी भूमिका ममता बॅनर्जी यांनी मांडली.

 

मागे

नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?
नाशिकची सिंगल वॉर्ड पद्धत कुणाला सत्ताधीश करणार?

अवघ्या दीड वर्षावर येऊन ठेपलेल्या नाशिक महापालिका निवडणुकीत वॉर्ड रचना अर....

अधिक वाचा

पुढे  

मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग
मुंबई - पुणे महामार्गावर धावत्या खासगी बसला आग

मुंबई - पुणे एक्स्प्रेसवर (Mumbai-Pune highway) मध्यरात्री एक धक्कादायक घटना घडली. चालत्....

Read more