ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 11:17 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील भाजीपाला मार्केट सुरु, नागरिकांना दिलासा

शहर : मुंबई

भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 21 दिवसांचा लॉकडाऊन घोषित केला. त्यामुळे सर्व दुकानं, खासगी कंपन्या, सार्वजनिक वाहतूक, बाजारपेठा या बंद ठेवण्यात आल्या आहेत. बाजारपेठा बंद राहिल्याने लोकांना भाज्या मिळत नव्हत्या. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत व्हावा म्हणून मुंबई कृषी उत्पन बाजार समिती सुरु ठेवण्याचा निर्णय अन्न नागरी पुरवठ व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी घेतला आहे.

बाजारपेठ सुरु होणार असल्याने बाजारपेठेच्या गेटवर महत्त्वाची सूचनाही लावण्यात आली आहे. या सूचनेमध्ये म्हटले की, व्यापारी, अडते, दलाल, खरेदीदार, वाहतूकदार, माथाडी कामगार, मापाडी आणि इतर सर्व घटकांनी आवक गेटवर उपलब्ध असलेले थर्मलचेक अप करून, सॅनिटायझरने हात धुवून आणि मास्क तोंडाला बांधून मार्केटमध्ये प्रवेश करावा. जर या सुचनेचे उल्लंघन केल्यास एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल आणि संबंधीतावर योग्य ती कारवाई करण्यात येईल.

जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत राहण्यासाठी राज्य सरकारकडून अनेक नियोजन करण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या गाड्यांना पोलिसांनी आडवू नये, असे आदेश छगन भुजबळ यांनी प्रशासनाला दिले आहेत.

बाजारपेठा बंद असल्याने भाज्यांचा तुटवडा होत होता. त्यामुळे नागरिकांनाही भाज्या मिळत नव्हत्या. भाज्या मिळत नसल्याने भाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. याचा फटका नागरिकांना बसत आहे. तसेच बाजारपेठा बंद असल्याने शेतकऱ्यांचेही नुकसान होत होते. त्यामुळे बाजारपेठा सुरु करण्यात येत आहे.

मागे

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात चौथ्या ....

अधिक वाचा

पुढे  

..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज
..तर भारतात 15 मेपर्यंत 13 लाख करोनाग्रस्त, धक्कादायक अंदाज

ज्या वेगाने देशात करोनाचा फैलाव होतो आहे तो वेग तसाच राहिला तर 15 मे पर्यंत कर....

Read more