ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 09, 2021 06:13 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नरेंद्र मोदी राज्यसभेत का भावूक झाले? मोदींना प्रणव मुखर्जींची आठवण का झाली?

शहर : देश

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) राज्यसभेत माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी (Pranab Mukherjee) यांच्या आठवणीनं भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. नरेंद्र मोदी राज्यसभेत निवृत्त होणाऱ्या राज्यसभा खासदारांना निरोप देण्यासाठी भाषण करत होते. यावेळी त्यांनी गुलाम नबी आझाद यांच्या कार्याचं कौतुक केलं आहे. (Narendra Modi emotional  in remembrance of Pranab Mukherjee)

गुलाम नबी आझादासंह चार खासदार निवृत्त

राज्यसभेतील गुलाम नबी आजाद, शमशेर सिंह, मीर मोहम्मद फैयाज, नादिर अहमद हे सदस्य निवृत्त होत आहेत. त्यांना निरोप देण्यासाठी नरेंद्र मोदी बोलत होते. नरेंद्र मोदी यांनी या सर्व जणांनी राज्यसभेचा गौरव वाढवण्याचं काम केले. त्यांचा अनुभव, त्यांचं ज्ञान याचा देशाला फायदा झाला. या सर्वांनी त्यांच्या क्षेत्रांचा विकास करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल त्यांचा आभारी आहे, असं मोदी म्हणाले.

गुलाम नबी आझाद ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी मी देखील एका राज्याचा मुख्यमंत्री होतो. त्यावेळी आमच्यामध्ये जवळचे संबंध होते. ज्यावेळी गुजरातच्या यात्रेकरुंवर दहशतवाद्यांनी हल्ला केला त्यामध्ये 8 लोक मारले गेले. त्यावेळी पहिल्यांदा गुलाम नबी आझाद यांचा फोन आला होता. त्यावेळी ते अश्रू रोखू शकले नव्हते. त्यावेळी गुलाम नबी आझाद आणि माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी गुजरातच्या लोकांसाठी केलेले प्रयत्न विसरु शकत नाही. दोन्ही नेत्यांनी त्यांच्या कुटुंबातील व्यक्ती अडकल्यासारखं काम केले, असं नरेंद्र मोदी म्हणाले.

गुलाम नबी आझाद यांच्या नंतर जे त्यांचं पद सांभाळतील त्यांना गुलाम नबी आझाद यांनी त्या पदाला दिलेली उंची गाठण्यासाठी कष्ट करावे लागतील. गुलाम नबी आझाद यांना त्यांच्या पक्षासोबत देशाची आणि राज्यसभेची काळजी असायची, असं मोदी म्हणाले.

मागे

अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?
अजित पवार आणि बच्चू कडू यांच्यात तू तू मैं मैं; नेमकं काय घडलं…?

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यात तू तू ....

अधिक वाचा

पुढे  

‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक
‘मी नशीबवान, मला पाकिस्तानात जावं लागलं नाही’, निरोपाच्या भाषणात गुलाम नबी आझाद भावूक

राज्यसभेचा कार्यकाल संपल्यानंतर आपल्या निरोपाच्या भाषणात काँग्रेसचे ज्य....

Read more