ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भिवंडीत 3 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल रस्त्यासह वाहून गेला

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 07, 2019 03:11 PM 2019-02-12T14:15:30+5:30

भिवंडीत 3 महिन्यांपूर्वी बांधलेला पूल रस्त्यासह वाहून गेला

शहर : ठाणे

भिवंडी तालुक्यात गेले चार दिवस कोसळत असलेल्या मुसळधार पावसामुळे पिलंजे गावातील 3 महिन्यापूर्वीच बांधलेला पूल रस्त्यात वाहून गेला परिणामी पाच आदिवासी पाड्यांवर जाणारा रस्ता बंद झाल्याने नागरिकांची परवड होत आहे. महत्वांचे म्हणजे हा पूल मागील पावसाळ्यातही वाहून गेला होता. मार्च-एप्रिल 2019 मध्ये पुन्हा बांधण्यात आला होता. 

या संदर्भात अधिक माहिती अशी की, अनगाव जवळच्या पिलंजे ग्रामपंचायत हद्दीतील भवर पाडा, बेंदरपाडा, नंबरपाडा, वारणापाडा, आगपाडा या आदिवासी पाड्यांवर जाण्यासाठी, जिल्हा परिषदेने एमएमआरडीएच्या माध्यमातून 80 लाख रुपये खर्च करून 2018 मध्ये रस्ता आणि काही ठिकाणी पूल बांधले मात्र पावसामुळे पिलंजे गावातील पूल रस्त्यासह वाहून गेला. शिवाय रस्त्यावर पाइप टाकलेल्या मोर्या्ही दोन ठिकाणी वाहून गेल्या. त्यामुळे आदिवासी पाडयातील विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी, रुग्णांना रुग्णालयात नेण्यासाठी आणि रोजगारासाठी अनगाव-भिवंडीकडे जाण्याकरिता 4 कि.मी. चा वळसा घालून जाव लागत आहे. 
 

मागे

रिझर्व्ह बँकेकडून चौथ्यांदा रेपो दरात कपात
रिझर्व्ह बँकेकडून चौथ्यांदा रेपो दरात कपात

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने आज पुन्हा एकदा रेपो दरात 35 टक्यांनी कपात केल्याने ....

अधिक वाचा

पुढे  

स्वामीकारांच गाव पाण्याखाली
स्वामीकारांच गाव पाण्याखाली

चंदगड तालुक्यातील कोवाड हे गाव आपण ओळखतो ते स्वामीकार रणजीत देसाई यांचे गा....

Read more