ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मे 18, 2020 10:58 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतून गावी पोहोचलेल्या १५ वर्षीय मुलाचा मृत्यू, ६ दिवस घरातच ठेवला मृतदेह

शहर : सातारा

कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाऊन करण्यात आलंय. लॉकडाऊन दिवसेंदिवस वाढत असल्यामुळे मुंबईतील अनेकजण आपापल्या गावी जात आहेत. मात्र असं गावी जाणं आता गावकऱ्यांसाठी धोक्याचं असल्याचं उघडकीस आलं आहे.

सातारा-म्हाते खृर्द जावली गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. मुंबईतून आलेल्या कुटुंबातील १५ वर्षीय मुलाचा मृत्यी झाला. मात्र कुटुंबियांनी तब्बल दिवस हा मृतदेह राहत्या घरीच ठेवल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेनंतर परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे.

२७ मार्च रोजी कोरोनाचा पार्श्वभूमीवर १५ वर्षीय मुलासह मुंबईतून गावी आले होते. हा मुलगा गेल्या सात-आठ महिन्यांपासून आजारी होता. मुंबईहून येऊन दीड महिना झाल्यानंतर मुलाचा घरातच मृत्यू झाला. मात्र कुटुबियांनी ही बाब लपवून ठेवली. याबाबतची कोणतीही माहिती पोलिसांना अथवा गावकऱ्यांनी दिली नाही. घरातून दुर्गंधी येत असल्यामुळे शेजारच्या लोकांनी घरात जाऊन पाहिले. तेव्हा हा सगळा प्रकार उघडकीस आला.

या घटनेनंतर मेढा पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलमध्ये पाठवलं आहे. मुलाला कोरोनाची लागण तर झाली नव्हती ना? असा प्रश्न गावकऱ्यांच्या मनात आला आहे. जर मुलाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असेल तर सहा दिवस मृतेदह घरात ठेवणं खूप धोकादायक आहे. यामुळे कुटुंबातील इतरांना देखील कोरोनाची लागण होऊ शकते अशी भीती व्यक्त केली जात आहे. मुलाच्या पालकांनी मृतेदह घरातच ठेवण्यामागचं कारण काय? असा देखील प्रश्न उभा राहत आहे.

मागे

अर्थमंत्र्यांचा दावा खोटा, मजुरांचा संपूर्ण प्रवास खर्च राज्य सरकारकडून : अनिल देशमुख
अर्थमंत्र्यांचा दावा खोटा, मजुरांचा संपूर्ण प्रवास खर्च राज्य सरकारकडून : अनिल देशमुख

स्थलांतरित मजुरांच्या रेल्वे तिकीटचा 85 टक्के खर्च केंद्र सरकार उचलत आहे.अस....

अधिक वाचा

पुढे  

बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात
बेस्ट कर्मचाऱ्यांनी जिंकली मनं, नेत्यांचं आवाहन झुगारून 'बेस्ट' योद्धे रणांगणात

कोरोनाच्या संकटातही अत्यावश्यक सेवेकऱ्यांसाठी अत्यावश्यक असलेली मुंबईच....

Read more