ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जुलै 30, 2020 10:13 AM 2019-02-12T14:15:30+5:30

कोविड-१९ रुग्णांचा शोध, संपर्क शोधण्यावर अधिक भर द्या – मुख्यमंत्री

शहर : मुंबई

कोविड-१९ संदर्भातील मंत्रिमंडळ बैठकीत सादरीकरणानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील पालिकांना कोविड रुग्णांचा शोध आणि जास्तीत जास्त संपर्क शोधण्यावर भर देण्यासंदर्भात सर्व मंत्र्यांना सूचना केल्यागेल्या आठवड्यात मुंबईतील वॉर्ड अधिकाऱ्यांच्या बैठकीत देखील आपण कुठेही गाफील राहता संकट आटोक्यात येत नाही तोपर्यंत सावध राहण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितले

केवळ लॉकडाऊन करणे महत्त्वाचे नाही, तर रुग्णांचा शोध घेऊन त्यांचे जास्तीत जास्त संपर्क शोधणे तसेच त्यांना वेळीच अलगीकरण सुविधेमध्ये दाखल करणे, योग्य ते उपचार तात्काळ सुरु करणे आवश्यक आहे. सर्व पालिकांनी या दृष्टीने अतिशय काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिलेत.

पीपीई कीट आणि मास्कचा पुरवठा सप्टेंबरनंतर बंद करण्याचे केंद्राने सांगितले आहेमात्र, आपण पंतप्रधान मोदी यांना हा पुरवठा पुढील काळात देखील सुरु ठेवावा, अशी विनंती केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. यावेळी प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले की, महाराष्ट्रामधील मृत्यूदर आता .६२ टक्के इतका कमी झाला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी २७ दिवसांवर गेला आहे.

मुंबईमध्ये रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी ७० दिवस झाला आहेदर १० लाख लोकसंख्येमध्ये सर्वाधिक रुग्ण हे ठाणे, मुंबई आणि पुणे या भागातील असून कल्याण-डोंबिवली महापालिका, पुणे, उल्हासनगर, नवी मुंबई या पालिकांमध्ये जास्त प्रमाणात रुग्ण आढळत आहेत, असे प्रधान सचिव आरोग्य डॉ. प्रदीप व्यास यांनी सांगितले.

 

मागे

मिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता
मिशन बिगिन अगेन ३ । राज्यात पाहा कधीपर्यंत असणार लॉकडाऊन कायम, काही नियमात शिथिलता

केंद्र सरकारने लॉकडाऊनच्या नियमात ३१ ऑगस्टपर्यंत वाढ केलेली आहे. त्यानंतर ....

अधिक वाचा

पुढे  

सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती
सरकारी नोकरीची संधी, संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती

संरक्षण मंत्रालयामध्ये विविध पदांची भरती करण्यात येत आहे. इच्छूक पदवीधर अभ....

Read more