ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 26, 2020 11:04 AM 2019-02-12T14:15:30+5:30

देशात कोरोनाची रुग्णसंख्या ६०० वर तर मुंबईत आकडा पन्नाशीपार

शहर : देश

कोरोना व्हायरसने जगभरात थैमान घातले आहे. स्पेन, इटली आणि अमेरिकेतील स्थिती दिवसेंदिवस अधिक गंभीर होताना दिसतेय. स्पेनमध्ये कोरोनामुळे एका दिवसात ७०० जणांचा मृत्यू झालाय. भारतातही या भयावह आजारामुळे जनतेला घरातच राहण्याचा सल्ला दिला गेलाय. आतापर्यंत देशात कोरोनाचे ६०६ रुग्ण आढळले आहेत. यामध्ये १० जण मृत्यूमुखी पडले आहेत. महाराष्ट्रात कोरोनाबाधितांची संख्या १२३ तर मुंबईत रुग्णांची संख्या पन्नाशीपार गेल्याची आकडेवारी समोर आली आहे.

गोव्यामध्ये कोरोनाचे ३ रुग्ण आढळले आहेत. असे असतानाही दिलासादायक बातमी म्हणजे आतापर्यंत ४२ रुग्ण ठणठणीत बरे होऊन घरी गेले आहेत. 

मोदी सरकार १० कोटी लोकांच्या खात्यात थेट पैसे जमा करणार असल्याचं समजतंय.  यासाठी दीड लाख कोटींचं पॅकेज घोषित करणार असल्याचं सांगण्यात येतंय. सरकारने तूर्त या निर्णयाची अंतिम घोषण केलेली नाही. पंतप्रधान कार्यालय, अर्थमंत्रालय आणि रिझर्व बँकेच्या अधिकाऱ्यांसोबत चर्चेनंतर लवकरच ही घोषणा होण्याची शक्यता आहे.

टोलवसुली स्थगित

केंद्रीय परिवहन विभागाने एक महत्वाचा निर्णय जाहीर केलाय. या निर्णयानुसार १४ एप्रिल पर्यंत टोलवसूली स्थगित करण्यात आली आहे. देशभरात कोरोनाचे सावट घोंघावत असताना केंद्रीय परिवहन मंत्रालयाचा हा निर्णय महत्वाचा मानला जातोय.देशभरातील टोल वसुली तात्पुरती स्थगित करण्याची घोषणा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे.कोरोनामुळे अत्यावश्यक सेवांना अडसर निर्माण होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं गडकरी यांनी सांगितले आहे.

मागे

देशाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी चिदंबरम यांचा १० कलमी कार्यक्रम
देशाला आर्थिक संकटातून वाचण्यासाठी चिदंबरम यांचा १० कलमी कार्यक्रम

कोरोना वायरसच्या विरोधात लढण्यासाठी संपूर्ण देश २१ दिवस लॉकडाऊन करण्याचे ....

अधिक वाचा

पुढे  

महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू
महाराष्ट्रातील मृतांचा आकडा चारवर, वाशीतील कोरोनाबाधित महिलेचा मृत्यू

महाराष्ट्रातील कोरोनाचा विळखा वाढताना दिसत आहे. कारण महाराष्ट्रात चौथ्या ....

Read more