ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: एप्रिल 23, 2019 10:34 AM 2019-02-12T14:15:30+5:30

राज्यात स्वाइनची दहशत कायम; १२० जणांचा बळी

शहर : मुंबई

वातावरणात बदल होत असल्याने राज्यात स्वाइन फ्लूची दहशत कायम आहे. जानेवारी ते एप्रिल यादरम्यान राज्यभरात स्वाइन फ्लूमुळे एकूण १२० जणांचा बळी गेला आहे. याखेरीज, राज्यात सध्या पुणे महानगरपालिकेच्या हद्दीतील चार रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर राज्यात हजार ३४६ स्वाइन फ्लूचे रुग्ण आहेत. आॅसेलटॅमिवीर या गोळ्या देण्यात आलेल्या संशयित फ्लू रुग्णांची संख्या १५ हजार ५२४ एवढी आहे. बळी गेलेल्यांमध्ये मुंबईतील पाच रुग्णांचा समावेश आहे.

राज्यात सर्वाधिक मृत्यू नाशिक जिल्ह्यात झाले असून ही संख्या २५ एवढी आहे. मागील काही दिवसांमध्ये उन्हाचा चढणारा पारा आणि रात्रीचा थंडावा अशा दुहेरी वातावरणामुळे स्वाइन फ्लूचा जोर राज्यात वाढल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली आहे.नाशिकनंतर नागपूरमध्ये १६ तर अहमदनगरमध्ये १३ रुग्णांचा मृत्यू स्वाइन फ्लूमुळे झाला आहे. गेल्या वर्षी राज्यात स्वाइन फ्लूमुळे ४६१ बळी गेले होते, तर रुग्णांची संख्या हजार ५९३ एवढी होती.

मागे

क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !
क्रॉफर्ड मार्केटमधील शॉपिंग सेंटरला आग !

दक्षिण मुंबई येथील क्रॉफर्ड मार्केटमध्ये  एका शॉपिंग सेंटरला आग लागली आह....

अधिक वाचा

पुढे  

पालघरमध्ये झोपाळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू
पालघरमध्ये झोपाळ्यावरून पडून मुलीचा मृत्यू

पालघरमध्ये उद्यानातील झोपाळ्यावरून पडून एका 12 वर्षांच्या मुलीचा मृत्यू झा....

Read more