By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 11, 2019 06:51 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
कडधान्ये आपल्या आहारात महत्त्वाची भूमिका बजावतात. मात्र, आजच्या धकाधकीच्या काळात घरातूनच काय तर हॉटेलमधूनही कडधान्याची हकालपट्टी झाली आहे. यांच्या अभावामुळे मानवाच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होताना दिसत आहे. कडधान्ये जास्त शिजविल्यानंतरही त्याच्यातील पोषक द्रव्ये कायम राहतात. तसेच त्यात भरपूर जीवनसत्वेही असतात. जाणून घेऊया कडधान्याचे फायदे...
तूरडाळ : यात खनिज, कार्बोहायड्रेट, लोहयुक्त खनिज, कॅल्शियम यांचे योग्य प्रमाण असते. तूर डाळ पचण्यास सोपी जाते. लहान बाळांना तूरडाळीचे पाणी पिण्यास देतात. तसेच आजारी व्यक्तीस तूरडाळीची खिचडी खाण्यास देतात. मात्र, दमा व वाताचे आजार असणाऱ्या व्यक्तींना तूरडाळीपासून त्रास होतो.
मूग : शिजवलेल्या किंवा भिजवलेल्या मुगामध्ये भरपूर पोषक द्रव्ये असतात. ते मानवास आरोग्यासाठी फायद्याचे असातात. कोंब आलेल्या मुगामध्ये कॅल्शियम, लोहयुक्त खनिज, प्रोटीन, कार्बोहायड्रेट आणि व्हिटॅमिन्स यांचे प्रमाण अधिक असते. ताप व खोकला असलेल्याा व्यक्तीसाठी मूग लाभदायी आहे.
हरभरे : हरभरे व हरभऱ्याची डाळ आपल्या आरोग्यासोबतच सौंदर्यासाठीही उत्तम आहे. यात कार्बोहायड्रेट, प्रोटीन, कॅल्शियम, लोहयुक्त खनिज व व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असतात. रक्तदाब, खोकला व कावीळ या आजारावर लाभदायी असून याच्या डाळीचे पीठ केस व त्वचेच्या सौंदर्यासाठी गुणकारी असते.
उडीद : उडदाची डाळ शरीरासाठी शीत असते. मानवी आहारात तिचा उपयोग करतेवेळी शुद्ध तुपात हिंग टाकून त्याची वाफ द्यावी. यातही कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व प्रोटीन भरपूर प्रमाणात आढळतात. मुळव्याध, दमा, पक्षाघात आदी आजार असलेल्यांनी त्यांच्या आहारात उडीद डाळीचा जास्त वापर केला पाहिजे.
मटकी : मटकी व त्याची डाळ कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन्स, कॅल्शियम व प्रोटीनयुक्त असल्याने कृष्ठरोग व विषमज्वरनाशक असते.
मसूर : मसूर डाळीचा उपयोग रक्तशुद्धी तसेच रक्तवाढीसाठी होतो. जुलाब, खोकला आणि अपचन यावरही मसूरची डाळ लाभदायी असते.
छातीत जळजळ होत असेल तर व्हा सावधान! होऊ शकते ही गंभीर समस्या गॅस्ट्रोएसोफेग....
अधिक वाचा