ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

प्रेम आणि मैत्रीचे नाते मौल्यवान आहे, त्यावर कधाही संशय घेऊ नका

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 30, 2019 01:40 PM 2019-02-12T14:15:30+5:30

प्रेम आणि मैत्रीचे नाते मौल्यवान आहे, त्यावर कधाही संशय घेऊ नका

शहर : मुंबई

लोककथेनूसार पुरातन काळात एका राजाच्या महानगरीत एक संत आले. जेव्हा राजाची संतासोबत भेट झाली तेव्हा राजा खुप प्रभावित झाला. संताचे ज्ञान धर्म आणि लोकांच्या सुख दुःखाशी निगडित होते. यामुळे राजाने त्यांना आपल्या सोबत ठेवले. राजमहालात त्यांना एक शाही कक्ष देऊन सर्व सुखसोयी दिल्या. राज्याच्या बऱ्याच कामात राजा संतांचा सल्ला घेत असे.

एक दिवस राजा आणि संत दोघेही जंगलात फेरफटका मारण्यासाठी गेले. घनदाट जंगल असल्यामुळे दोघेही घराची वाट चुकले. खुप भटकंती केल्यानंतरही त्यांना रस्ता सापडत नव्हता. भुकेने दोघे खूप व्याकुळ झाले होते. तितक्यात राजाला एक फळ दिसले. त्याने फळ तोडले आणि फळाचे सहा तुकडे केले. राजाने पहिला तुकडा गुरूंना खायला दिला. पहिला तुकडा खाल्यावर संत म्हणाले हे फळ तर फारच स्वादिष्ट आहे मला आणखी द्या. एकपाठोपाठ एक गुरूजींनी राजा जवळचे पाच तुकडे खाल्ले .

यावर राजाला प्रचंड राग आला आणि तो संतांना म्हणाला की मी सुद्धा उपाशी आहे आणि तुम्ही एकटेच सर्व फळ खात आहात असे म्हणून राजाने तो शेवटचा तुकडा खाल्ला. जसे राजाने ते फळ खाल्ले त्याने ते फळ थुंकले, कारण ते खुप कडू होते. राजाने संतांना विचारले की तुम्ही एवढे कडवट फळ कसे खाऊ शकता. त्यावर संत राजाला म्हणाले की, राजन आपण मला नेहमी गोड फळ खाऊ घातले आहे. केवळ एकदा कडवट फळ दिल्यावर मी तक्रार कसा करू शकतो. मी पुर्ण फळ खाणार होतो, म्हणजे तुम्हाला कडवे फळ खावे लागणार नाही.

कथेची शिकवण या छोट्याशा कथेची शिकवन एवढीच की, जिथे प्रेम आणि मैत्रीचे नाते असते त्यावर कधीच शंका घेऊ नका. कारण शंकेचे नाते कधीच टिकत नाही. ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा.

मागे

आपल्या जीवनात अनेकदा संधी येतात, पण ...
आपल्या जीवनात अनेकदा संधी येतात, पण ...

स्वामी विवेकानंद यांचे गुरु रामकृष्ण परमहंस यांच्याशी निगडित अनेक प्रेरक ....

अधिक वाचा

पुढे  

कुटूंबात सर्वांनी एकमेकांची काळजी घेतली तर प्रेम वाढते...
कुटूंबात सर्वांनी एकमेकांची काळजी घेतली तर प्रेम वाढते...

प्राचीन काळातील एका कथेनुसार, एका गावात दोन भाऊ राहत होते. थोरल्या भावाचे लग....

Read more