By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 19, 2019 12:46 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
लोककथेनुसार प्राचीन काळी एका राजाच्या राज्यात दुष्काळ पडला. यामुळे त्याला कर मिळाला नाही. राजाला राज्याचा खर्च कसा चालवावा आणि भविष्यात दुष्काळही पडणार नाही, यासाठी काय करावे याची चिंता वाटू लागली. शेजारची राज्य आपल्या राज्यावर आक्रमण करतील अशीही भीती राजाला होती. एकदा त्याने काही मंत्र्यांना त्याच्याविरुद्ध षडयंत्र रचतानासुद्धा पकडले होते.
राजाला या सर्व चिंतेमुळे झोप लावत नव्हती. भूकही कमी झाली होती. शाही जेवणात दररोज वेगवेगळे व्यंजन केले जायचे परंतु राजा दोन-तीन घासच खाऊ शकत होता. राजा आपल्या शाही बागेतील माळ्याला दररोज पाहत होता. तो माळी दररोज चवीने कांदा आणि चटणीसोबत सात-आठ भाकरी खायचा.
राजाच्या गुरूने हे सर्वकाही पाहिले आणि ते राजाला म्हणाले, राजन् तुला नोकरी जास्त चांगली वाटत असेल तर तू माझ्याकडे नोकरी करावी. मी तर आहे साधू त्यामुळे मी आश्रमातच राहणार परंतु हे राज्य चालवण्यासाठी मला एक नोकर पाहिजे. तू पूर्वीप्रमाणे महालात राहा. गादीवर बसून शासन कर, हीच तुझी नोकरी आहे.
कथेची शिकवण -: गुरूने राजाला समजावले की, सर्वकाही पूर्वीसारखेच आहे परंतु पूर्वी तू ज्या कामाला ओझे समजे होते आता ते फक्त आपले कर्तव्य समजून करत आहेस.
आपल्याला हे आयुष्य कर्तव्य पूर्ण करण्यासाठी मिळाले आहे. कोणत्याही दडपणाचा ओझ्याखाली दबून जाण्यासाठी मिळाले नाही. काम कोणतेही असो, चिंता ते काम अधिक अवघड बनवते. जे कोणते काम मिळेल ते कर्तव्य समजून करावे.
हे कधीही विसरू नये की, आपण काहीही घेऊन आलो नव्हतो आणि काहीच घेऊन जाणारही नाहीत. ही गोष्ट लक्षात ठेवल्यास तुम्हीही नेहमी सुखी राहू शकता.
अडचणी आणि आव्हाने जीवनाचा एक भाग आहेत. असा एकही मनुष्य नाही ज्याने जीवनात कध....
अधिक वाचा