ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सत्तास्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 12, 2019 11:28 AM 2019-02-12T14:15:30+5:30

सत्तास्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ

शहर : मुंबई

सत्तास्थापनेवरून काँग्रेस आणि राष्ट्रवादीत मोठा गोंधळ निर्माण झाला आहे. शरद पवारांनी काँग्रेस नेते अहमद पटेल यांना फोन करून दोन दिवसांची मुदत मागितल्याचा दावा काँग्रेस नेते माणिकराव ठाकरेंनी केला आहे. मात्र असा कुठलाही फोन राष्ट्रवादीकडून गेला नसल्याची प्रतिक्रिया अजित पवारांनी  दिली. तर राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळेंनीही आपण माणिकराव ठाकरेंना नव्हे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधीना ओळखतो असा टोला लगावला आहे.

काँग्रेससोबत निवडणूक लढवल्याने काँग्रेस आणि राष्ट्रवादी एकत्र चर्चा करुन निर्णय़ घेतील. असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. पण शिवसेनेशिवाय सत्तास्थापन शक्य नाही असं देखील त्यांनी म्हटलं आहे. शिवसेनेला सोमवारी सत्तास्थापनेसाठी आमंत्रण देण्यात आलं होतं. पण राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या आमदारांच्या पाठिंब्याचं पत्र मिळाल्याने शिवसेनेत पुन्हा शांतता पसरली आहे. यावर उद्धव ठाकरे यांनी शरद पवार यांना फोन करुन नाराजी देखील व्यक्त केल्याची माहिती मिळते आहे. पण अजित पवार यांनी याचं खापर काँग्रेसवर फोडलं आहे. काँग्रेसने पत्र द्यायला उशीर केल्याचं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

 

मागे

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच अजूनही कायम
महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच अजूनही कायम

महाराष्ट्राच्या राजकारणात सत्तेचा पेच अजूनही सुटलेला नाही. काँग्रेस आमदा....

अधिक वाचा

पुढे  

बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही - भाजप
बाळासाहेबांना तुम्ही वचन दिलं, पवार-सोनियांनी नाही - भाजप

‘तुम्ही भले वचन दिले असेल, शरदराव आणि सोनियांनी थोडेच वचन दिलंय’ असं म्ह....

Read more