ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 13, 2020 08:01 PM 2019-02-12T14:15:30+5:30

... म्हणून मी मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही; महाधिवक्ता कुंभकोणींचा गौप्यस्फोट

शहर : मुंबई

भाजप सरकारच्या काळात मराठा समाजाकडून करण्यात आलेल्या आग्रही मागणीमुळेच मी आतापर्यंत मराठा आरक्षण खटल्यात युक्तिवाद केला नाही, असा गौप्यस्फोट राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी केला. सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा खटला नुकताच घटनापीठाकडे वर्ग केला होता. मात्र, यावेळी न्यायालयाने राज्यातील मराठा आरक्षणाला अंतरिम स्थगिती दिल्याने यावरून राजकारण तापले आहे.

या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचे माजी वकील निशांत कटनेश्वरकर यांनी आशुतोष कुंभकोणी यांच्यावर आरोप केले होते. महाराष्ट्राचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी हे आरक्षणाच्या प्रकरणात युक्तिवाद करण्यासाठी एकदाही उच्च न्यायालय सर्वोच्च न्यायालयात गेले नाहीत. महाधिवक्ता म्हणून या प्रकरणात युक्तिवाद करणे त्यांचे कर्तव्य होते. मात्र, त्यांनी तसे केले नाही. त्यामुळे आजच्या निर्णयाला तेही जबाबदार असल्याचे निशांत कटनेश्वरकर यांनी म्हटले होते. यावर आशुतोष कुंभकोणी यांनी आपली बाजू मांडताना म्हटले की, मराठा आरक्षणावर उच्च न्यायालयात सुनावणी सुरु असताना जानेवारी २०१९ मध्ये सोलापूर येथे मराठा संघटनांची बैठक झाली होती. त्यावेळी सरकारच्यावतीने माजी महाधिवक्ता व्ही. . थोरात यांना युक्तिवाद करण्याची परवनागी द्यावी, अशी मागणी मराठा संघटनांनी केली. यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला तशी विनंती केली. या विनंतीला मा देऊन मी प्रत्यक्ष न्यायालयात युक्तिवाद केला नाही. मात्र, मराठा आरक्षणासाठी इतर सर्व गोष्टींची तयारी करण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न केल्याचे कुंभकोणी यांनी सांगितले.

 

 

 

मागे

मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल
मोदीजी, ही शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय, बच्चू कडुंचा सवाल

केंद्र सरकारने काही महिन्यांपूर्वी उठवलेली कांद्यावरील निर्यातबंदी आता प....

अधिक वाचा

पुढे  

"आत्तापासून मी भाजप-आरएसएससोबत", राज्यपालांच्या भेटीनंतर माजी नौदल अधिकाऱ्याची घोषणा

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे आक्षेपार्ह व्यंगचित्र सोशल मीडियावर पोस्ट ....

Read more