ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अहो चोरी करणारा जज म्हणून बसला तर निकाल काय लागायचा - शरद पवार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 12, 2019 03:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अहो चोरी करणारा जज म्हणून बसला तर निकाल काय लागायचा - शरद पवार

शहर : पुणे

"मुख्यमंत्री सांगतात माझं सरकार पारदर्शक...निष्कलंक होतं...माझ्या सरकारवर कुणी आरोप केले नाही. मग धनंजय मुंडे यांनी 20 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराचे पुरावे दिले त्यांच्यापैकी काहीना का उमेदवारीची तिकीटं नाकारली...अहो चोरी करणारा जज म्हणून बसला तर निकाल काय लागायचा केसचा..." असा जबरदस्त टोला लगावतानाच राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी दौंड येथील जाहीर सभेत मुख्यमंत्र्यावर जोरदार घणाघाती टीका केली.

"विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी 20 मंत्र्यांच्या भ्रष्टाचाराची प्रकरणे दिली. मुख्यमंत्र्यांने सांगितले मी तपासलं यात काही नाही. म्हणून आम्ही तिसऱ्या माणसाकडे तपासायला दया सांगितले, नाही तपासू दिले. यांनी जर चुकीचे काही केले नसेल तर मग मंत्रीमंडळातील काही मंत्र्यांना पुन्हा का तिकीट नाही दिले. पाच मंत्र्यांना तिकीट पुन्हा दिले नाही. का त्यांना गाळलं? कुठेतरी काहीतरी गडबड आहे. म्हणून त्यांना तिकीट दिलं नाही ना. ज्यांना तुम्ही तिकीटं देवू शकत नाही. त्यांच्यावर कारवाई करत नाही आणि आम्हाला सांगतात आमचं सरकार पारदर्शक अहो यांच्यावर कसा विश्वास ठेवायचा ?" असा सवालही शरद पवार यांनी केला. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे, त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची आहे, असे आवाहन शरद पवार यांनी केले.

पुरुषच कर्तृत्वाचा मक्ता घेवून आला आहे, हा समज आहे मात्र हे खरं नाही. जिचं कर्तृत्व आहे त्या कर्तृत्वाला महत्व दिलं पाहिजे. अमेरीकेत सैन्यदलात मुली आहेत आपल्याकडे का नाही. संरक्षणमंत्री असतानाचा किस्सा यावेळी सांगताना शरद पवार यांनी भारताच्या हवाई दलात, सैन्य दलात संधी देण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे आज लढावू विमाने घेवून आपल्या मुली जात आहेत. संधी दिली की, तिथेही कर्तृत्व दाखवता येतं असं सांगतानाच मी मुख्यमंत्री असताना देशात पहिल्यांदा असा निर्णय घेतला होता की, सोसायटी असो की ग्रामपंचायत असो, नगरपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद असो, स्थानिक स्वराज्य संस्थेत 33 टक्के आरक्षण महिलांना दिले. आता 50 टक्के जागा महिलांना दिल्या आहेत.आज त्या महिला पंचायत समिती, जिल्हा परिषदा चांगल्याप्रकारे सांभाळत आहेत अशा शब्दात महिलांचे कौतुक शरद पवार यांनी केले.

समाज पुढे न्यायचा असेल तर स्त्री-पुरुष, तरुण असो, दलित,ओबीसी,आदिवासी या सगळयांना घेवून पुढे जाता आले पाहिजे. हे काम राष्ट्रवादी कॉंग्रेस आणि कॉंग्रेस करत आहे . मात्र हे काम भाजप करताना दिसत नाही. समाज सुधारण्याची वृत्ती ज्यांच्याकडे नाही त्यांना आम्ही मताचा पाठिंबा देणार नाही त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. महाराष्ट्राचा चेहरामोहरा बदलायचा आहे. त्यामुळे ही निवडणूक महत्वाची आहे. म्हणून ज्यांच्या हातात ही सत्ता आहे त्यांच्या हातातून सत्ता काढून घ्यायची आहे असे आवाहनही शरद पवार यांनी केले.

राज्यात पाच वर्षापूर्वी आलेल्या सरकारला राज्यातील लहान घटकांची चिंता नाही. यांच्या नाकर्तेपणामुळे राज्यातील 16 हजार शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या. याउलट केंद्रसरकारने देशाच्या धनिष्टांचे कर्जाचे ओझे माफ करून 82 हजार कोटींचे कर्ज फेडले. आज संपूर्ण देशात शेतीची अवस्था बिकट आहे हे या राज्यकर्त्यांच्या नजरेत कसे येत नाहीअसा संतप्त सवालही शरद पवार यांनी सरकारला केला. दौंड विभागात आपण कारखानदारी उभी केली. याचा फायदा इथल्या लोकांना झाला. पण आजच्या राज्यकर्त्यांनी केलेल्या चुकीच्या धोरणामुळे इथल्या कामगारांना महिनोमहिने पगार मिळत नाही. यामुळे इथली अर्थव्यवस्था बिघडली आहे. तरीदेखील तुम्ही मतांचा जोगवा मागायला कसे येतात असा सवाल शरद पवार यांनी सरकारला केला.

 

मागे

उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, भाजपच्याच जिल्हाध्यक्षाने केली मागणी
उद्धव ठाकरेंवर कारवाई करा, भाजपच्याच जिल्हाध्यक्षाने केली मागणी

महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीसाठी भाजप आणि शिवसेनेची युती झाली असली त....

अधिक वाचा

पुढे  

राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; शरद पवारांचा शिवसेनेला टोला
राज्य चालवायला दिलंय की स्वयंपाकाला; शरद पवारांचा शिवसेनेला टोला

राज्यात सत्ता आल्यावर अवघ्या दहा रुपयांमध्ये भरपेट जेवण देऊ, अशी घोषणा करण....

Read more