ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'गोड बातमी' राहिली बाजूला, उलट गुंता वाढला...

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: नोव्हेंबर 07, 2019 05:50 PM 2019-02-12T14:15:30+5:30

'गोड बातमी' राहिली बाजूला, उलट गुंता वाढला...

शहर : मुंबई

'लवकरच गोड बातमी मिळेल', असं मावळते अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी सांगितलं. भाजपचे नेते राज भवनावर जाणार असल्यानं गुरुवारी गोड बातमी मिळेल, अशी अपेक्षा होती. पण सरकार स्थापनेचा दावा न करताच, केवळ राज्यपालांशी कायदेशीर बाबींवर चर्चा करून भाजपचे नेते परतले. त्यामुळं गोड बातमी मिळाली नाहीच.

भाजप आणि शिवसेनेतल्या सत्तासंघर्षामुळं महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा तिढा आणखीच वाढलाय... अगदी पंधरावा दिवस उलटला तरी अजून मुख्यमंत्रिपदाचा पाळणा काही हललेला नाही. गोड बातमी मिळेल, असं सांगून चक्क बनवाबनवी सुरूय की काय? अशी शंका येऊ लागलीय.

विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून १५ वा दिवस उजाडला तरी अजून सत्ता स्थापनेचा घोळ संपत नाहीय. भाजप आणि शिवसेनेतला संघर्ष संपण्याऐवजी आणखीच वाढत चाललाय. शिवसेना आमदारांच्या मातोश्रीवर झालेल्या बैठकीत शिवसेनेचाच मुख्यमंत्री झाला पाहिजे, असा सूर उमटला.

शिवसेना नेते संजय राऊत यांनी तर तिखट शब्दांत भाजपवर हल्ला चढवला. राऊत यांच्या भडीमारामुळं सत्तासंघर्ष आणखीच तीव्र झाला झालाय.

गोड बातमी मिळेल म्हणून आशेवर असणाऱ्यांचा पुरता विचका झालाय. गोड बातमी राहिली बाजूला, उलट पाळणा आणखी लांबल्यानं भाजप-शिवसेनेच्या संसारात आणि महाराष्ट्रात घटनात्मक पेच निर्माण झालाय. सरकार बनवणं दूर, राजकीय पक्षांकडून जनतेची नुसतीच बनवाबनवी सुरू आहे. 

 

मागे

भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो
भाजप कार्यकर्त्यांचं होमहवन, शिवनेसेनेला सदबुद्धी देवो

भाजप नेते भुषण शिंगने यांनी नागपूरच्या कल्याणेश्वर मंदिरात देवाकडे साकडे ....

अधिक वाचा

पुढे  

राज्याच्या राजकारणात “वादळ”, शरद पवारांचा कोकणदौरा रद्द?
राज्याच्या राजकारणात “वादळ”, शरद पवारांचा कोकणदौरा रद्द?

महाराष्ट्रात इतर भागातील चक्रीवादळामुळे वातावरणात अचानक बदल होत आहेत, त्य....

Read more