ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

...म्हणून मोदी सरकारने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्या आहेत: कपिल सिब्बल

By NITIN MORE | प्रकाशित: जानेवारी 27, 2020 05:48 PM 2019-02-12T14:15:30+5:30

...म्हणून मोदी सरकारने मौल्यवान मालमत्ता विकायला काढल्या आहेत: कपिल सिब्बल

शहर : delhi

          नवी दिल्ली :  केंद्र सरकार एअर इंडियातील १०० % हिस्सा विकणार असल्याची माहिती संसदेत देण्यात आली होती. यावर टीका करताना कॉंग्रेसचे नेते अॅड कपिल सिब्बल यांनी जोरदार टीका करताना म्हंटले आहे की, मोदी सरकारच्या तिजोरीत पैसेच उरले नसल्याने एअर इडिया कंपनी विकण्यासाठी काढली आहे. 

         यासंदर्भात बोलताना, अॅड सिब्बल पुढे म्हणाले की, जेव्हा सरकारच्या हातात पैसे नसतात तेव्हा असे केले जाते. सध्यादेखील भारत सरकारच्या तिजोरीत पैसे उरलेले नाहीत. अर्थव्यवस्थेचा विकासदर ५% पेक्षा कमी आहे. मनरेगासारख्या योजनांचे कोट्ट्यावधी रुपये थकले आहे. सध्याच्या घडीला एअर इंडियावर जवळपास ५८ हजारकोटी रुपयांचे कर्ज आहे. मध्यंतरी केंद्र सरकारने निधी पुरवून एअर इंडियाचे पुंनरुज्जीवन करण्याचाही प्रयत्न केला. मात्र तरीही एअर इंडियाच्या परिस्थितीत फरक पडला नाही, त्यामुळे आता सरकार पुढे एअर इंडिया विकण्याशिवाय कोणताही पर्याय उरलेला नाही. एअर इंडिया खरेदीसाठी प्रस्ताव दाखल करण्याकरिता १७ मार्च २०२० ही अखेरची तारीख आहे. या बरोबरच सरकारने एअर इंडिया एक्सप्रेस आणि एअरपोर्ट  सर्व्हिस कंपनी या दोन सरकारी अनुदाणीत कंपन्यांसाठी बोली मागवली आहे. बोलीप्रक्रियेत पात्र ठरणार्‍यांना ३१ मार्चपर्यंत माहिती देण्यात देईल. 

        १९३२ साली जेआरडी टाटा यांनी टाटा एअरलाईन्सची स्थापना केली होती. मात्र १९५३ साली सरकारने कंपनीचे सार्वजनिकीकरण करीत ही कंपनी ताब्यात घेतली होती. 

मागे

विधान परिषद बरखास्त; आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय
विधान परिषद बरखास्त; आंध्रप्रदेश सरकारचा निर्णय

         हैदराबाद : आंध्रप्रदेशाचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी या....

अधिक वाचा

पुढे  

पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र
पंतप्रधानांच्या बुलेट ट्रेन प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांचे टीकास्त्र

                मुंबई : भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा महत्त्वा....

Read more