ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 25, 2020 01:02 PM 2019-02-12T14:15:30+5:30

Bihar Election | बिहारचं राजकारण, संख्याबळ ते सत्ताकारण, कोण किती वरचढ?

शहर : देश

बिहार विधानसभा निवडणुकीचं बिगूल आजपासून वाजणार आहे. राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांचं तुरुंगात असणं, मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या लोकप्रियतेला लागलेली आहोटी, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा वाढता करिष्मा, काँग्रेसकडे नेतृत्वाची असलेली वाणवा आणि देशभरात कोरोना संसर्गाचा निर्माण झालेला कहर या पार्श्वभूमीवर यंदाची बिहार विधानसभा निवडणूक होत असून या निवडणुकीकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे. या निवडणुकीत पुन्हा नितीश कुमार यांची सरशी होणार की लालू प्रसाद यादव तुरुंगातूनही आपला करिष्मा कायम राखणार? हे येणारा काळच ठरवणार आहे.(Bihar Assembly Election Results 2015 )

बिहार विधानसभेचा कार्यकाळ २९ नोव्हेंबर रोजी संपत आहे. राज्यात एकूण २४३ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात 243 पैकी 38 जागा अनुसूचित जातीसाठी आणि 2 जागा अनुसूचित जनजातीसाठी राखीव आहेत. बिहारमध्ये सध्या एकूण 7 कोटी 29 लाख मतदार आहेत. २०१५ मध्ये ही मतदारसंख्या 6. 68 कोटी एवढी होती. म्हणजे यंदा जवळपास 68 लाख नव्या मतदारांची भर बिहारमध्ये पडली आहे. त्यामुळे हा नवमतदार कुणाच्या पारड्यात मतदान टाकणार? हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे. हा नवमतदार बिहारच्या निवडणुकीचं गणित बदलू शकणार नसला तरी त्याचा या निवडणुकीवर नक्कीच प्रभाव जाणवेल असं राजकीय जाणकारांचं म्हणणं आहे.

लालू-नितीश साथ-साथ

२०१५मध्ये राष्ट्रीय जनता दलाचे नेते लालूप्रसाद यादव यांनी महाआघाडीची निर्माण केली होती. या आघाडीत नितीशकुमार यांचा जेडीयू आणि काँग्रेसचाही समावेश होता. तर भाजपने आरएलएसपी आणि रामविलास पासवान यांच्या लोजपाशी युती करून निवडणूक लढवली होती. त्यावेळी नितीशकुमार हे महाआघाडीचा निवडणुकीतील महत्त्वाचा चेहरा असले तरी लालूप्रसाद यादव हेच खरे स्टार प्रचारक होते. मात्र, दोन वर्षांतच नितीशकुमार यांनी लालूंच्या महाआघाडीशी फारकत घेऊन भाजपशी हात मिळवणी करून सत्ता स्थापन केली होती.

लालूंच्या जागा सर्वाधिक तरीही नितीशकुमार मुख्यमंत्री

2015मध्ये महाआघाडीला 243 जागांपैकी 178 जागांवर विजय मिळाला होता. तर भाजप आघाडीला अवघ्या 58 जागांवरच समाधान मानावे लागले होते. इतर आणि अपक्षांना एकूण 7 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीत आरजेडीला 80, जेडीयूला 71 आणि काँग्रेसला 26 जागा मिळाल्या होत्या. महाआघाडीतून निवडणूक लढल्यामुळे गेल्या 25 वर्षांत काँग्रेसला पहिल्यांदाच चांगलं यश मिळालं होतं. तर, भाजप आघाडीत भाजपला 53 जागा मिळाल्या होत्या. तर लोजपाला 2, आरएलएसपीला 2 आणि एचआयएमला एका जागेवर समाधान मानावे लागले होते. (Bihar Assembly Election Results 2015 )या निवडणुकीत लालूप्रसाद यादव हेच किंग मेकर ठरले होते. सर्वाधिक जागा मिळाल्यानंतर राजदचा मुख्यमंत्री होण्याची पूर्ण शक्यता असतानाही लालूंनी सर्वच राजकीय निरीक्षकांना धक्का देत नितीशकुमार यांच्या गळ्यात मुख्यमंत्रीपदाची माळ टाकली होती. लालूंचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला होता. दरम्यान, दोन वर्षानंतर नितीशकुमार यांनी राजदशी असलेला घरोबा तोडत थेट भाजपशी हात मिळवणी करत सवतासुभा रचला होता.

अशी झाली 2015ची निवडणूक      

2015मध्ये बिहार विधानसभा निवडणूक 12 ऑक्टोबरला सुरू होऊन 5 नोव्हेंबरपर्यंत चालली होती. 8 नोव्हेंबर रोजी निवडणूक निकाल जाहीर झाले होते. निवडणूक आयोगाने पाच टप्प्यात निवडणुका घेतल्या होत्या. 2015मध्ये राज्यात 6.68 मतदार होते. त्यावेळी 56 टक्के मतदारांनीच मतदानाचा हक्क बजावला होता.

 

मागे

कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार
कृषी विधेयकाविरोधात 'भारत बंद', देशभरातील शेतकरी रस्त्यावर उतरणार

संसदेत नुकतेच पारित करण्यात आलेल्या कृषी विधेयकाविरोधात शेतकरी संघटनांकड....

अधिक वाचा

पुढे  

BiharElections 2020:बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल
BiharElections 2020:बिहारमध्ये तीन टप्प्यांत मतदान, १० नोव्हेंबरला निकाल

निवडणूक आयोगाकडून शुक्रवारी दिल्लीत पत्रकारपरिषद घेऊन बिहार विधानसभा निव....

Read more