ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सामना रंगतदार होणार- श्रेयस अय्यर

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: मे 08, 2019 02:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सामना रंगतदार होणार- श्रेयस अय्यर

शहर : मुंबई

विश्वचषक स्पर्धा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून आयपीएलमधील विदेशी खेळाडू बर्‍यापैकी आपापल्या संघांमध्ये दाखल होण्यासाठी परतले असून त्याचा तोटा सनरायजर्स हैदराबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघांना जाणवत असून आयपीएलच्या एलिमेनेटर सामन्याच्या पुर्वी बोलताना दिल्लीच्या संघाचा कर्णधार श्रेयस अय्यर याने या बाबत आपले मत व्यक्त केले असून या खेळाडूंच्या अनुपस्थितीतही सामना रंगतदार होईल अशी अशा त्याने व्यक्त केली आहे.
यावेळी दिल्लीच्या संघाचा मुख्य गोलंदाज कगिसो रबाडा मायदेशी परतला असून सनरायजर्स हैदराबादच्या संघातील प्रमुख खेळाडू डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्ट्रोहे माघारी परतले आहेत. त्यामुळे दोन्ही संघांची मदार दुसर्‍याफळीतील खेळाडूंवर अधीक असणार आहे असे मत अय्यरने व्यक्त केले आहे.
यावेळी दिल्लीच्या संघातून खेळणार्‍या कगिसो रबाडाने यंदाच्या मोसमात 25 बळी मिळवले असून तो सध्या पर्पल कॅप मिळवण्याच्या स्पर्धेत अव्वल स्थानी विराजमान आहे. तर, डेव्हिड वॉर्नरने यंदा 692 धावा केल्या असून तोही ऑरेंज कॅपच्या स्पर्धेत अव्वल स्थानी आहे. त्यामुळे या दोन्ही खेळाडूंवर दिल्ली आणि हैदराबादचे संघ जास्त प्रमानात अवलंबून आहेत. 

मागे

अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नईमध्ये लढत 
अंतिम फेरीमध्ये जाण्यासाठी आज मुंबई-चेन्नईमध्ये लढत 

स्पिनर्सना साथ देणार्‍या विकेटवर चेन्नईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी क....

अधिक वाचा

पुढे  

हैदराबादची चांगली सुरूवात 
हैदराबादची चांगली सुरूवात 

काही काळ गुणतालिकेत टॉपवर असलेल्या दिल्ली कॅपिटल्सला मुंबई इंडियन्सने शे....

Read more