ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 13, 2019 03:21 PM 2019-02-12T14:15:30+5:30

घरातील मातीचे भांडे देखील तुमच्या भाग्याचे दार उघडू शकतात

शहर : मुंबई

घरात ठेवलेले मातीचे भांडे देखील तुमचे भाग्य उजळू शकतात. शास्त्रानुसार मातीच्या भांड्यांना फारच पवित्र मानण्यात आले आहे. आधी मातीने तयार केलेल्या भांड्यांमध्ये जेवण केले जात होते. वास्तूप्रमाणे घरात ठेवलेले मातीचे भांडे जेथे एकीकडे तुमच्या जीवनात सकारात्मक ऊर्जा आणतात तसेच यांचे घरात किंवा ऑफिसमध्ये असल्याने तुम्ही गुडलक, धन-वैभव, यश सर्व काही मिळवू शकता. देवाघरापासून लग्नाच्या सोहळ्यापर्यंत पूजेसाठी वापरण्यात येणारे सर्व भांडे मातीचे असतात.

घरात ठेवा माठात पाणी

वास्तूनुसार असे म्हटले जाते की घरातील उत्तर पूर्व दिशेत मठात पाणी भरून ठेवायला पाहिजे. असे म्हटले जाते की यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा येत नाही. आरोग्याच्या दृष्टीने बघितले तर हे अधिक फायदेशीर असत. वास्तूनुसार जर एखादा व्यक्ती ताण तणाव किंवा मानसिक समस्येचे शिकार असेल तर त्यांनी त्या माठाचे पाणी प्यायला पाहिजे.

घरात पूजेसाठी देवाची मूर्ती जर मातीची आणाल तर तुमच्या घरात नेहमी बरकत राहील. एवढंच नव्हे तर घरात मातीचे सजावटी भांडे जसे वाटी, फ्लावर पॉटला

दक्षिण-पूर्व दिशेत ठेवू शकता. असे केल्याने घरात सौभाग्य वाढत.

मागे

वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे हे संकेत
वास्तुशास्त्रानुसार अशुभ आहे हे संकेत

शुभ आणि अशुभ शास्त्रानुसार शुभ आणि अशुभ सारख्या संकेतांना आम्ही बर्‍याच ....

अधिक वाचा

पुढे  

अन्नावर कधी राग काढू नये...
अन्नावर कधी राग काढू नये...

ताटावरून उठविणे, उठणे, ताट फेकून देणे हे अत्यंत वाईट असते. माणसाच्या हातून क....

Read more