ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

नारळी पौर्णिमा: कोळी लोकांचा महत्त्वाचा सण

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 14, 2019 03:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30

नारळी पौर्णिमा: कोळी लोकांचा महत्त्वाचा सण

शहर : मुंबई

समुद्राकाठी रहाणार्या प्रामुख्याने मासेमारी करणार्या कोळी लोकांचा हा महत्त्वाचा सण आहे. पावसाळ्यात समुद्र प्रचंड खवळलेला असतो. बोटी, जहाजांची वर्दळ या काळात बंद असते. समुद्राचा कोप होऊ नये, जहाजे, नौका सुरक्षित रहाव्यात, समुद्र शांत होण्यासाठी कोळी बांधव या दिवशी समुद्राची पूजा करतात. पूजेसाठी समुद्राला यथाशक्तीप्रमाणे सोन्याचा नारळ अथवा नारळ अर्पण करत असतात. म्हणून या सणाला नारळी पौर्णिमा असे म्हणतात. यादिवशी कोळी लोक आपल्या होळ्या घेऊन मासेमारी करण्यासाठी समुद्रात जातात.

श्रावणातील ही पौर्णिमा ही समुद्र किनार्यालगत राहणार्या लोकांना मोठी आनंदाची असते. खवळलेला समुद्र शांत होतो, पावसाचा जोर ओसरतो कोळी बांधव मासेमारीस प्रारंभ करतात. सुरक्षिततेची समुद्र देवाला प्रार्थना केली जाते. या सणाला नारळाचे गोड पदार्थ यार केले जातात. भारताला सुमारे 1517 कि.मी. लांबीचा महाराष्ट्राला सुमारे 720 कि.मी. लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे.

मागे

रक्षाबंधन
रक्षाबंधन

आपल्या हिंदुसंस्कृतीत कुणी कुणाची आई आहे, तर कुणी कुणाचा भाऊ किंवा बहीण आहे.....

अधिक वाचा

पुढे  

आरोग्यासाठी खास आहे रक्षासूत्र,राखी बांधवण्याचे 3 फायदे
आरोग्यासाठी खास आहे रक्षासूत्र,राखी बांधवण्याचे 3 फायदे

भाऊ-बहिणीच्या पवित्र प्रेमाचं प्रतीक आहे रक्षाबंधनाचा सण. या दिवशी बहिणी आ....

Read more