ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

‘लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही…’, ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर जया बच्चन यांचा संताप?

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: जानेवारी 18, 2024 09:59 AM 2019-02-12T14:15:30+5:30

 ‘लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही…’, ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर जया बच्चन यांचा संताप?

शहर : मुंबई

ऐश्वर्या रायच्या इंटिमेट सीनवर जया बच्चन यांनी व्यक्त केला संताप, म्हणाल्या, 'लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही, सध्या फक्त आणि फक्त...', सर्वत्र जया बच्चन यांच्या वक्तव्याची चर्चा...

अभिनेत्री जया बच्चन आणि अभिनेत्री ऐश्वर्या राय कामय कोणत्या न कोणत्या कारणामुळे चर्चेत असतात. आता देखील जया बच्चन त्यांच्या स्पष्ट आणि सडेतोड वक्तव्यामुळे चर्चेत आल्या आहेत. सांगायचं झालं तर ‘ऐ दिल है मुश्किल सिनेमात अभिनेत्री ऐश्वर्या राय हिने अभिनेता रणबीर कपूर याच्यासोबत इंटिमेट सीन दिले होते. ज्यामुळे बच्चन कुटुंबात नाराजी होती. Jio MAMI 18 फिल्म फेस्टिवलमध्ये जया बच्चन याने सिनेमांमधील इंटिमेट सीनवर मोठं वक्तव्य केलं आहे. ज्यामुळ जया बच्चन चर्चेत आहेत.

आजच्या सिनेमांवर नाराजी व्यक्त करत जया बच्चन म्हणाल्या, ‘सध्या घडीला लोकं सिनेमे फक्त आणि फक्त पैशांसाठी करतात. लोकांना आता इंटिमेट सीन करताना लाज नावाची गोष्ट राहिलेली नाही. सिनेमाचं गांभीर्य आता नष्ट होत आहेसर्वांसमोर प्रेमाचं प्रदर्शन करताना प्रत्येक जण दिसत आहे…’ पण यादरम्यान जया बच्चन यांनी ऐश्वर्या आणि दिल है मुश्किलसिनेमाचं नाव घेतलं नाही. पण इंटिमेट सीन्सचा विरोध केला..

ऐश्वर्या राय आणि जया बच्चन

गेल्या काही दिवसांपासून बच्चन कुटुंबाबद्दल अनेक गोष्टींवरुन चर्चा सुरु आहे. जया बच्चन यांचं सून ऐश्वर्या राय हिच्यासोबत पटत नाही म्हणूनऐश्वर्या हिने सासर सोडलं अशी देखील चर्चा रंगली होती. एवढंच नाही तर ऐश्वर्या आणि अभिषेक यांचा घटस्फोट होणार असलेल्या चर्चांना देखील उधाण आलं होतं.. पण अभिषेक याने मुलाखातीच्या सर्व रंगणाऱ्या चर्चांना पूर्ण विराम दिला .

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चन यांनी अनेक वर्ष एकमेकांना डेट केल्यानंतर लग्न करण्याचा निर्यण घेतला. 2007 मध्ये ऐश्वर्याअभिषेक यांनी लग्न केलं. त्यानंतर 2011 मध्ये ऐश्वर्या हिने आराध्या बच्चन हिला जन्म दिला. सोशल मीडियावर देखील आराध्या हिचे आईवडिलांसोबत अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल होत असतात.

दिल है मुश्किलसिनेमा

दिल है मुश्किलसिनेमात ऐश्वर्या हिच्यासोबत अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा मुख्य भूमिकेत होते. सिनेमाने बॉक्स ऑफिसवर तुफान कमाई केली. सिनेमातील गाणी आणि डायलॉग आज देखील चाहत्यांमध्ये चर्चेत असतात. सिनेमात अभिनेता शाहरुख खान याने देखील पाहुण्या कलाकाराची भूमिका साकारली होती.

मागे

वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट
वयाच्या 50 व्या वर्षी ट्विंकलने मिळवली ग्रॅज्युएशन डिग्री; अक्षय कुमारकडून भावूक पोस्ट

ट्विंकलने आजवर बरीच पुस्तकं लिहिली आहेत. 'मिसेस फनीबोन्स', 'पजामास आर फर....

अधिक वाचा

पुढे  

फक्त एक हिट चित्रपट देऊन 27 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुख, दीपिका, प्रभासलाही टाकलं मागे
फक्त एक हिट चित्रपट देऊन 27 वर्षीय अभिनेत्रीने शाहरुख, दीपिका, प्रभासलाही टाकलं मागे

या अभिनेत्रीला ‘नॅशनल क्रश’चा टॅग मिळाला आहे. तिच्या चित्रपटाने अवघ्या 2....

Read more