ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तामिळनाडू - पाँडिचेरीत पावसाचे १७ बळी, शाळांना सुट्टी जाहीर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 02, 2019 06:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30

तामिळनाडू - पाँडिचेरीत पावसाचे १७ बळी, शाळांना सुट्टी जाहीर

शहर : देश

तामिळनाडू आणि पाँडिचेरीमध्ये पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहेत. या पावसामुळे १७ जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान, पुढील काही तासांत पाऊस पडण्याची शक्यता असून पावसाच्या इशाऱ्यामुळे शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

तामिळनाडूत मुसळधार पावसाने दैना उडवून दिली आहे. मेट्टूपलायमजवळच्या नादूर गावात चार घरे कोसळली असून या दुर्घटनेत दोन लहान मुलांसह १७ जणांचा मृत्यू झाला आहे. सोमवारी पहाटे ही दुर्घटना घडली. नादूर हे गाव कोइमबतोरपासून ५० किमी अंतरावर आहे. सर्व जण गाढ झोपेमध्ये असताना पहाटेच्या ५.३० च्या सुमारास ही घटना घडली.

घराजवळ एक २० फूट उंचीची भिंत होती. हीच भिंत घरांवर कोसळल्याने घरे जमीनदोस्त झालीत. घराच्या ढिगाऱ्याखाली अनेकजण नअडकले होते. त्यांना बाहेर काढण्यासाठी बचाव पथकाने मदत केली. या बचाव पथकाने सर्व मृतदेह बाहेर काढून मेट्टूपलायममधील सरकारी रुग्णालयात पाठवले आहेत.

 

 

मागे

एक नवा पैसाही केंद्राला पाठवला नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण
एक नवा पैसाही केंद्राला पाठवला नाही, देवेंद्र फडणवीसांचं स्पष्टीकरण

भाजप खासदार अनंत कुमार हेगडे यांनी फडणवीसांच्या नेतृत्त्वात महाराष्ट्रात....

अधिक वाचा

पुढे  

'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'
'निर्भया' निधीचा एक पैसाही फडणवीस सरकारने खर्च केला नाही'

माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्या कार्यकाळात घेतलेल्या प्....

Read more