By Sudhir Shinde | प्रकाशित: जुलै 24, 2019 04:24 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
काल पासून मुसळधार पावसात संध्याकाळी 7.30 च्या सुमारास जावेद मुल्ला व त्यांचा मुलगा बापर्डे मार्गे देवगड ला जात होते. पाऊस जास्त असल्यामुळे बापर्डे येथील अधोळीची व्हाळी येथे पाण्याचा जोर जास्त होता. त्यामुळे त्यांनी तेथे गाडी उभी केली होती. तेवढ्यात पाण्याचा जोर वाढल्याने त्यांची गाडी पाण्यात कलंडून ते दोघे व गाडी पाण्याच्या मुख्य प्रवाहात ओढले गेले. त्यावेळी सदर घटना घडताना त्या ठिकाणी कोणीही नव्हते परंतु त्यांचं दैव बलवत्तर म्हणून कि काय श्री राजेंद्र पायजी नाईकधुरे हा तरुण आपला भाऊ न आल्यामुळे सदर ठिकाणी गेला असता. त्याला त्या बाप लेकाचा आरडा ओरडा ऐकू आला. त्या वेळी त्यांनी पाहीले असता सदर बाप लेक पाण्याच्या मुख्य प्रवाहात असलेल्या एका झाडाला लटकत होते. सभोवताली पाणीच पाणी होते, त्यावेळी राजेंद्र यांनी लगेचच मदतीसाठी इतरांना बोलवून घेतले , त्यावेळी लगेचच संजय धुरे, संतोष धुरे, संदीप धुरे शशांक धुरे, हरेश धुरे, रवींद्र धुरे व राजेंद धुरे यांनी जीवाची पर्वा न करता सदर बापलेकाना वाचवण्यासाठी प्रयत्न सुरु केले. सदर प्रयत्नएखाद्या तरबेज व प्रशिक्षण घेतलेल्या आपत्कालीन व्यवस्थेप्रमाणे करून त्यांचे प्राण वाचविले ,बापर्डे पंचक्रोशीतूनसर्व मदतगारांचे अभिनंदन होत आहे.
बीटेकसाठी एक लाख रुपये फी भरणे अशक्य झाल्याने मोहोळ तालुक्यातील देगावचे रह....
अधिक वाचा