ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

अॅक्सिस बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 08, 2020 04:04 PM 2019-02-12T14:15:30+5:30

अॅक्सिस बँकेच्या १५ हजार कर्मचाऱ्यांचा राजीनामा

शहर : देश

         मुंबई - भारतातील सर्वांत मोठ्या बँकेच्या यादीतील खासगी क्षेत्रातील अॅक्सिस बँकेच्या तब्बल १५ हजार कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. ही संख्या वाढत असून त्यात वरिष्ठ पातळीवरील अधिकाऱ्यांचाही समावेश आहे. नवीन व्यवस्थापन, कार्यपद्धती आणि कामाचा व्याप वाढल्याने बहुतांश कर्मचाऱ्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला आहे.


     दरम्यान, नवनवीन तंत्रज्ञान आणि बँकेच्या कार्यपद्धतीत आमूलाग्र बदल करण्यात आहे. नव्या पध्द्तीशी जुळवून घेण्यात वरिष्ठ पातळीवरील अधिकारी अपयशी ठरल्याने त्यांनी राजीनामा देणे पसंत केले. ऑटोमेशन आणि आर्टिफिशिअल इंटेलिजन्स यासारखे नव्या तंत्रज्ञानाला स्वीकारण्यास जुने कर्मचारी अपयशी ठरत असल्याने हे प्रमाण अधिक वाढते आहे. 


        गत वर्षाच्या तुलनेत यंदा कमर्चारी सोडून जाण्याचे प्रमाण १९ टक्क्यांवर गेले आहे. गेल्या वर्षी ते १५ टक्के होते. नुकताच बँकेचे मुख्य वित्तीय अधिकारी जयराम श्रीधरन यांनी राजीनामा दिला होता. बॉण्ड ट्रेडिंगचे प्रमुख शशिकांत राठी, जेपी सिंग, सिरील आनंद यांनी निवृत्तीचा निर्णय घेतला होता.


        त्यामुळे अॅक्सिस बँकेकडून नवीन कर्मचारी भरती देखील केली जात आहे. चालू वर्षात बँकेने २८ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. आणखी चार हजार कर्मचारी भरती केली जाणार आहेत. अॅक्सिस बँकेत ७२ हजार मनुष्यबळ आहे. त्यापैकी गेल्या आर्थिक वर्षात ११ हजार ५०० कर्मचाऱ्यांनी राजीनामा दिला आहे. 
 

मागे

ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची हत्या
ऑस्ट्रेलियात १० हजार उंटांची हत्या

      मेलबर्न - ऑस्ट्रेलियाच्या जंगलात लागलेली भीषण आग अजूनही उग्र रूप धा....

अधिक वाचा

पुढे  

केंद्राने पूरग्रस्त केरळला वगळले
केंद्राने पूरग्रस्त केरळला वगळले

          नवी दिल्ली - भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्र सरक....

Read more