ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

सोलापूरमध्ये उष्माघाताने महिलेचा मृत्यू

By MACHHINDRANATH PAWAR | प्रकाशित: एप्रिल 29, 2019 03:32 PM 2019-02-12T14:15:30+5:30

सोलापूरमध्ये उष्माघाताने महिलेचा मृत्यू

शहर : सोलापूर

राज्यात सध्या तापमानमध्ये खूप वाढ झाली आहे. या वाढीमुळे राज्यात अनेक जण उष्माघातेचे बळी पडले आहेत. सोलापूर शहरासह जिल्ह्यात उन्हाचा तडाखा चांगलाच वाढला असून जुळे सोलापूर परिसरात असलेल्या म्हाडा कॉलनीमधील सहवास नगरामधील एका महिलेचा या उन्हाच्या कडाक्याने बळी गेला आहे. कस्तुरा पवार (65) असे या मृत महिलेचे नाव आहे. रविवारी दुपारच्या सुमारास कडक उन्हामुळे कस्तुरा पवार यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यामुळे त्यांना शहरातील खासगी रूग्णालयात उपचारसाठी दाखल करण्यात आले होते़ मात्र अधिकचा त्रास झाल्याने सोमवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास त्यांचा मृत्यू झाला. सोलापूर शहरात गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा उन्हाची तीव्रता अधिक जाणवत आहे. एप्रिल महिन्यातच तापमानाचा पारा 43 अंशांच्या पुढे गेल्यामुळे नागरिकांना दुपारच्यावेळी घराबाहेर पडणे देखील कठीण होत आहे. परिणामी जिल्ह्यातील रस्त्यांवर दुपार दरम्यान शुकशुकाट दिसून येतो. गेल्या वर्षीपेक्षा यंदा एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात 43़4 अंश सेल्सिअस एवढे तापमान नोंदवले आहे़ या वाढलेल्या तापमानाचा फटका जनजीवनावर होतांना दिसून येत आहे. 
 

मागे

दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.74 टक्के मतदान
दुपारी 1 वाजेपर्यंत सरासरी 31.74 टक्के मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात राज्यातील 17 मतदारसंघात दुपारी 1 वाजेप....

अधिक वाचा

पुढे  

माटुंग्यातील बीग बाजारमध्ये भीषण आग
माटुंग्यातील बीग बाजारमध्ये भीषण आग

मुंबईतील माटुंग्याच्या पश्चिम भागातील बिग बाझारमध्ये भीषण आग लागली आहे. या....

Read more