ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 05, 2020 10:18 AM 2019-02-12T14:15:30+5:30

'अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योगही सुरू करण्याबाबत सरकार सकारात्मक'

शहर : मुंबई

कोरोनाचे संकट कायम असले तरी उद्योगचक्र बंद ठेवणे अर्थकारणासाठी परवडणारे नाही, त्यामुळे अनलॉक- मध्ये मुंबई महानगर इतर महानगरपालिका क्षेत्रातील अत्यावश्यक सेवेसोबत इतर उद्योग सुरु करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेण्यास तयार आहे. परंतु  यासाठी उद्योजक संघटनांनी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार आदर्श कार्य प्रणालीचे पालन करण्याची हमी देणारे प्रस्ताव सादर करणे आवश्यक असल्याचे मत उद्योगमंत्री सुभाष देसाई व्यक्त केले आहे.

राज्यातील विविध उद्योजक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांसमवेत मंगळावारी उद्योगमंत्र्यांनी वेबिनारद्वारे चर्चा केलीयावेळी उद्योग सचिव  वेणुगोपाल रेड्डी उपस्थित होते. यावेळी मुंबई, ठाणे, कल्याण, पनवेल, तळोजा, औरंगाबाद, नागपूर आदी भागातील उद्योजकांनी सूचना केल्या. यावेळी कंटेनमेंट झोन परिसरातील अत्यावश्यक  सेवा देणाऱ्या उद्योगांसोबत इतर उद्योगांनाही उत्पादनासाठी परवानगी देण्याची मागणी करण्यात आली. विशेषतः मुंबई, ठाणे, कल्याण, डोंबिवली इतर कंटेनमेंट झोन परिसरातील उद्योग मागील चार महिन्यांपासून ठप्प आहेत. त्याचा अर्थकारणावर मोठा परिणाम झाल्याचे उद्योजकांनी सांगितले.

दरम्यान, उद्योग सुरू करण्याबाबत आपण मुख्यमंत्र्यांसोबत चर्चा केली आहे. मुख्यमंत्री उद्योगचक्र  पूर्ववत करण्याबाबत सकारात्मक आहेत. परंतु त्यासाठी शासनाच्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करणे गरजेचे आहे. कोरोनाचा प्रसार रोखणे, सॅनिटायझेन, वाहतूक व्यवस्था आदी बाबीं पाळणे आवश्यक आहेशासनाने घालून दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करण्याची हमी देणारा प्रस्ताव सादर केल्यास शासन सकारात्मक भूमिका घेईल, असे देसाई यांनी सांगितले.

मुंबई परिसरात ज्या भागांत कोरोनाचा प्रभाव नाही, त्याठिकाणी वाहतूक व्यवस्थेसह उद्योग सुरू करण्यासाठी शासन नक्कीच विचार करील, असेही  देसाई यांनी सांगितले. नागपूर, औरंगाबाद इतर ठिकाणी वाहतुकीच्या समस्या असल्याचे काही उद्योजकांनी सांगितले. त्या सोडविण्याची ग्वाही एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी. अन्बलगन यांनी दिली.

मागे

मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच
मुंबईत मुसळधार पावसाची शक्यता, कोकणात संततधार सुरुच

शहात अनेक ठिकाणी पावसाचा जोर दिसून येत आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरात पावसा....

अधिक वाचा

पुढे  

माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन
माजी मुख्यमंत्री शिवाजीराव पाटील निलंगेकर यांचे पुणे येथे निधन

राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे जेष्ठ नेते शिवाजीराव पाटील निलं....

Read more