ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

भारतामुळे जगाच्या विकासाची गती मंदावल्याचा दावा 

By VISHRANTI SHINDE | प्रकाशित: जानेवारी 21, 2020 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

भारतामुळे जगाच्या विकासाची गती मंदावल्याचा दावा 

शहर : delhi

           नवी दिल्ली- गेल्या काही दिवसांपासून भारतीय अर्थव्यवस्था तळाला पोहचली आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासाचा दर आणखी घटला आहे. आर्थिक वर्ष २०१९- २० मध्ये भारताचा जीडीपी वाढीचा अंदाज हा फक्त ४.८ राहणार आहे. भारताचीच अर्थव्यवस्था सुस्तावल्याने आता जगातील वाढीचा अंदाज कमी करावा लागणार आहे. आयएमएफने केलेल्या जागतिक आर्थिक मंचाच्या बैठकीत विकासदराचा अंदाज घटल्याचा दावा केला आहे.


       आयएमएफच्या मुख्य अर्थशास्त्रज्ञ गगीता गोपीनाथ यांनी जागतिक वाढीच्या अंदाजात ८० टक्के घसरणीकरिता भारत जबाबदार असल्याचे सांगितले आहे. २०१९ चा जागतिक विकासदर २.९ टक्के आणि २०२० साठी त्याच विकासदराचा अंदाज ३.३ टक्के नोंदविण्यात आला आहे. जो ऑक्टोबर महिन्यात ०.१ टक्क्यांनं कमी आहे. 


        गैर बँकिंग वित्तीय क्षेत्रात असलेली उदासीनता आणि ग्रामीण क्षेत्रात उत्पन्नात आलेल्या कमीमुळे भारताचा आर्थिक विकासदर घटल्याचंही त्यांनी सांगितले. २०२० पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेची वाढ ५.८ टक्के आणि २०२१ मध्ये ६.५ टक्के होऊ शकते. भारताला प्रगती करताना आम्ही पाहत आहोत. पण सरकारसमोर सर्वात मोठी समस्या एनपीएची आहे, असंही त्या म्हणाल्या.       

मागे

रस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनीअर
रस्त्यावर भीक मागणारा निघाला इंजिनीअर

          ओडिसा : देशभरात वाढत्या लोकसंख्येमुळे बेरोजगार्‍यांच्या....

अधिक वाचा

पुढे  

आता साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीत मिळणार प्रवेश
आता साडेपाच वर्षांच्या मुलांना पहिलीत मिळणार प्रवेश

       मुंबई - लहान मुलांच्या हालचालींमधील सुसूत्रता, कौशल्ये, आकलन क्षम....

Read more