ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मूल्याधारीत रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज -  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

By Sudhir Shinde | प्रकाशित: सप्टेंबर 30, 2019 06:42 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मूल्याधारीत रोजगारपूरक शिक्षण काळाची गरज -  राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

शहर : मुंबई

महाराष्ट्रात शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि कौशल्यावर आधारित शिक्षण मिळणे गरजेचे आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची 150 वी जयंती साजरी करीत असताना मुल्यांवर आधारित शिक्षण रोजगारपूरकही असले पाहिजे, असे प्रतिपादन राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी केले.

राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली लवकरच राष्ट्रपती भवन येथे देशातील सर्व राज्यपालांची परिषद होणार आहे. या राज्यपाल परिषदेमध्ये विद्यापीठांच्या कामकाजाचा आढावा घेतला जाणार आहे. यादृष्टीने आज राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी महाराष्ट्रातील सर्व अकृषीकृषी विद्यापीठांच्या कुलगुरुंची बैठक राजभवन येथे आयोजित केली होती. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजयजलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवलेरुसाचे संचालक पंकजकुमार,अकृषीकृषी,आरोग्य आणि मुक्त विद्यापीठाचे कुलगुरु उपस्थित होते.

राज्यपाल श्री. कोश्यारी यावेळी म्हणाले कीउत्तम विद्यार्थीगुणवत्तापुर्ण शिक्षण अशी महाराष्ट्राची ओळख तयार करताना प्रत्येक कुलगुरुंनी आपल्या विद्यापीठाचा दर्जा सर्वच क्षेत्रात उंचावण्यासाठी स्वतः लक्ष घालून आपले विद्यापीठ हे उत्कृष्टतेचे केंद्र बनण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.विद्यार्थ्यांना चांगल्या शरिरासाठी दैनंदिन जीवनात योग करण्यासाठी प्रवृत्त करणेफिट इंडिया अभियान राबविण्यात पुढाकार घेणेसामाजिक प्रश्न सोडविण्यासाठी विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी प्रवृत्त करणे आवश्यक आहे.

अकृषी विद्यापीठांचा आढावा घेताना राज्यपाल भगत सिंह कोश्यारी म्हणाले की,  शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट कसे होईल यावर अभ्यास होणे आवश्यक आहे. असे करीत असताना मनरेगाअंतर्गत देण्यात येणाऱ्या कामांमध्ये शेतीला समाविष्ट करणे आवश्यक असेल. असेही श्री. कोश्यारी यांनी सांगितले.

प्रस्तावित नवे शैक्षणिक धोरणविद्यापीठातील प्रशासनात आवश्यक असणाऱ्या सुधारणागुणवत्ता सुधारसंशेाधन आणि नाविन्यताडिजिटल तंत्रज्ञानावर आधारीत उपक्रमअध्यापकांच्या रिक्त जागा भरणेमहाविद्यालयांचे नॅककडून राष्ट्रीय मूल्यांकनविद्यापीठांना देण्यात येत असलेली स्वायत्तारुसाअंतर्गत विद्यापीठांना मिळणारा निधी यासह विविध विषयांवर उपस्थित कुलगुरु यांनी आपली मते मांडली.

याच बैठकीत उच्च शिक्षणात येत्या काळातील अपेक्षित गुणवत्ता सुधारडिजिटल ग्रंथालयेई -लायब्ररीस्मार्ट वर्गकौशल्ययुक्त शिक्षणयोगचा अभ्यासक्रमात सहभागतर फिट इंडिया अभियान आणि उन्नत भारत अभियानाची अंमलबजावणी या बाबतही याबैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली.

उच्च व तंत्र शिक्षण विभागाचे सचिव सौरभ विजय यांनी यावेळी नवे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण कसे असेल याबाबत सादरीकरण केले. तर जलसंधारण विभागाचे सचिव एकनाथ डवले यांनी कृषी विद्यापीठाअंतर्गत करण्यात येणाऱ्या सुधारणा याविषयीची माहिती दिली. सर्व विद्यापीठाच्या कुलगुरुंनी राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढविण्यासाठी तसेच कृषी विद्यापीठांचा फायदा अधिकाधिक शेतकऱ्यांना कसा करता येईल याबाबतच्या सुधारणा यावेळी सुचविल्या

 

मागे

पुढल्या महिन्यात 11 दिवस बँक बंद
पुढल्या महिन्यात 11 दिवस बँक बंद

दिवाळी आणि दसऱ्या या सणांमुळे पुढील महिन्यात 11 दिवस बँका बंद राहणार आहेत. त्....

अधिक वाचा

पुढे  

कांद्याचे दर घसरले
कांद्याचे दर घसरले

कांद्याचे वाढते दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्र सरकारने कांदा निर्यातीवर....

Read more