ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन 'नापास' शेरा हद्दपार

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: डिसेंबर 05, 2019 11:31 AM 2019-02-12T14:15:30+5:30

दहावीनंतर आता बारावीच्या मार्कशीटवरुन 'नापास' शेरा हद्दपार

शहर : पुणे

दहावी आणि बारावीच्या गुणपत्रिकेवर आतानापास किंवाअनुत्तीर्ण शेरा हद्दपार होणार आहे. कारण नापास झालेल्या विद्यार्थ्यांच्या मार्कशीटवर आताकौशल्य विकासास पात्र असा शेरा दिला जाणार आहे. यापूर्वी हा निर्णय फक्त दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मर्यादित होता. मात्र नुकतंच महाराष्ट्र शासनाने बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी याबाबतचा निर्णय जाहीर केला आहे.

शासनाने काढलेल्या निर्णयानुसार, इयत्ता दहावी आणि बारावीची परीक्षा विद्यार्थ्यांच्या आयुष्याला वळण देणारा एक मोठा टप्पा असतो. या टप्प्यावर अनुत्तीर्ण झाल्यास समोरच्या भविष्याच्या वाटचालीत अडथळे निर्माण होतात. अशा तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण व्हावा आणि स्वत:च्या पायावर उभे राहण्याची क्षमता निर्माण व्हावी यासाठी दहावी आणि बारावी उत्तीर्ण होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांकरिता कौशल्य सेतू कार्यक्रम योजना राबवण्यात येणार आहे.यापूर्वी दहावीच्या परीक्षेत तीन किंवा त्यापेक्षा अधिक विषयांत उत्तीर्ण होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरकौशल्य विकासास पात्र हा शेरा दिला जात होता. मात्र आता त्याच धर्तीवर बारावीत नापास होणाऱ्या विद्यार्थ्यांच्या गुणपत्रिकेवरकौशल्य विकासास पात्र असा शेरा दिला जाणार आहे.

आतापर्यंत दोन विषयांत नापास असेल तर गुणपत्रिकेवर एटीकेटी हा शेरा दिला जायचा. तर तीन विषय किंवा त्याहून जास्त विषयात नापास असणाऱ्यांसाठी नापास हा शेरा होता. मात्र या निर्णयानंतर तीन किंवा त्यापेक्षा जास्त विषयात नापास होणाऱ्यांनाकौशल्य विकासास पात्र असा शेरा दिला जाणार आहे.यामुळे दहावी आणि बारावीत अनुत्तीर्ण होणाऱ्या तरुणांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी कौशल्य विकास प्रशिक्षण दिले जाणार आहे. यामुळे त्या तरुणांना स्वंय रोजगाराची संधीही मिळू शकेल.

मागे

काय आहे 'झिरो एफआयआर'? जी दाखल करण्यास पोलीस नकार देऊ शकत नाहीत
काय आहे 'झिरो एफआयआर'? जी दाखल करण्यास पोलीस नकार देऊ शकत नाहीत

नुकत्याच, हैदराबादमध्ये घडलेल्या 'निर्भया' बलात्कार आणि हत्याकांडानंतर....

अधिक वाचा

पुढे  

आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही
आरबीआयकडून बँक व्याजदरात कोणताही बदल नाही

रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ने रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही. आरबीआयने र....

Read more