ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार

By Sudhir Shinde | प्रकाशित: ऑगस्ट 09, 2019 05:27 PM 2019-02-12T14:15:30+5:30

मदत हवी तर 2 दिवस पाण्यात रहा – राज्य सरकार

शहर : मुंबई

पश्चिम महाराष्ट्रात अतिवृष्टीने थैमान मांडल्याने कोल्हापूर, सांगली, सातारा, जलमय झाले आहे. गेले पाच दिवस तेथील असंख्य कुटुंबे जगण्यासाठी संघर्ष करीत आहेत. अशा पूरग्रस्त कुटुंबांना दिलासा देण्याएवजी मदतीसाठी राज्य सरकारने अटी घातल्या आहेत. दोन दिवस पाण्याखाली असलेल्या कुटुंबाला 10 किलो गहू तांदूळ मोफत देण्यात येणार आहेत. असा जीआरसरकारने काढला आहे. म्हणजे मदत मिळविण्यासाठी 2 दिवस पाण्यात राहायला लागणार काय ? आणि नसतील पाण्यात तर मदत देणार नाही काय ?असा संतप्त प्रश्न विरोधकांनी सरकारला विचारला आहे. असा जीआर काढून पूरग्रस्तांची सरकारने थट्टा केल्याची टीका विरोधकांनी केली आहे.

पूरग्रस्तांच्या मदतीसाठी अजब निकष लावण्यात आला आहे. यासंबंधी  काढण्यात आलेल्या  जी आर मध्ये अतिवृष्टी वा पुरामुळे आपत्कालीन परिस्थिती उद्भवून दोन दिवसांपेक्षा अधिक कालावधीसाठी एखादे क्षेत्र पाण्यात बुडाले असल्यास, त्यामुळे निराधार होणार्‍या कुटुंबांना प्रती कुटुंब 10 किलो गहू व 10 किलो तांदूळ मोफत पुरविण्यास शासन निर्णयान्वये शासनाची मान्यता देण्यात आली आहे. असे म्हटले आहे.

मागे

कोल्हापुरात २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेटवर्क गायब
कोल्हापुरात २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेटवर्क गायब

कोल्हापुरात महापुरामुळे पुरती दैना झाली आहे. २ लाख घरात वीज नाही मोबाईल नेट....

अधिक वाचा

पुढे  

मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार
मराठवाड्यात कृत्रिम पावसाचा प्रयोग करणार

महाराष्ट्राच्या अनेक भागात मुसळधार पावसाने कहर केलेला असतानाच मराठवाडा म....

Read more