ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, मात्र रुग्णांची संख्या 52 वर

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: मार्च 20, 2020 11:20 AM 2019-02-12T14:15:30+5:30

महाराष्ट्रात सर्वात मोठा आशेचा किरण, 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर, मात्र रुग्णांची संख्या 52 वर

शहर : मुंबई

कोरोनाशी लढा देणाऱ्या महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणेला मोठं यश मिळताना दिसत आहे. कारण 5 रुग्ण डिस्चार्जच्या मार्गावर आहेत. त्यांना डिस्चार्ज देऊन, निरीक्षणासाठी विलगीकरणात ठेवण्यात येईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. एकीकडे हा दिलासा असताना, दुसरीकडे महाराष्ट्रातील कोरोनाबाधितांची संख्या 49 वरुन 52 वर पोहोचली आहे. आणखी तीन रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याने कोरोनाबाधितांचा आकडा 52 वर पोहोचला आहे. मुंबईत 1, पुणे 1 आणि पिंपरी चिंचवडमध्ये 1 रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्याची माहिती, आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.

दिलासादायक म्हणजे 5 रुग्ण जे रुग्णालयात अडमिट होते त्यांची प्रकृती सुधारली असून, लवकरच त्यांना डिस्चार्ज दिला जाईल, अशी माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. मुंबईत पत्रकार परिषद घेऊन आरोग्य मंत्र्यांनी कोरोनाबाबतची आजची अपडेट माहिती दिली.

राजेश टोपे म्हणाले, कोरोना आजार बरा होतो. पाच रुग्ण जे पॉझिटिव्ह होते, त्यांच्यावर उपचारानंतरचे रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. त्यांना डिस्चार्ज दिला जाण्याची शक्यता आहे. मात्र त्यांना सात ते आठ दिवस विलगीकरणात राहावे लागले.”

महाराष्ट्रातील एकूण संख्या 52 झाली आहे. तीन पेशंट वाढले आहेत. उपचाराचा शंभर टक्के खर्च सरकार करत आहे. महात्मा गांधी जनआरोग्य योजनेअंतर्गगत त्यांना विमाही देत आहोत, असं राजेश टोपे म्हणाले.

राज्यात आतापर्यंत एकूण 1036 जणांची कोरोना टेस्ट केली आहे. त्यापैकी 971 लोक निगेटीव्ह आहेत. काहींचे रिपोर्ट येणे बाकी आहे.

आपण लॅब टेस्टिंगची संख्या दिवसाला 2400 पर्यंत वाढवण्याचा प्रयत्न करत आहोत. सध्या 12 लॅब कार्यान्वित करायचा प्रयत्न आहे. तीन लॅब सध्या कार्यान्वित आहेत, असं टोपे यांनी सांगितलं.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आमच्य़ासोबत चर्चा करणार आहेत. वर्षा बंगल्यावरुन आम्ही चर्चा करणार आहोत. महाराष्ट्रात काही समस्या आहेत ते आम्ही पंतप्रधानांकडे मांडणार आहे. ते सुद्ध आम्हाला मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती टोपे यांनी दिली.

वैद्यकीयसेवा देणार सर्व डॉक्टर्स धोका पत्करुन सेवा  करत आहेत. त्यामुळे त्यांना जनतेने सहकार्य करावं, लोकांनी गर्दी करु नये. पंतप्रधान मोदींचा जनता कर्फ्यूचा निर्णय योग्य आहे. सर्वांनी सहभागी होऊन पंतप्रधानांच्या विनंतीला प्रतिसाद देऊ, कोरोनासारख्या संसर्गापासून मुक्त होण्यासाठी गर्दी टाळणे हा अत्यंत महत्त्वाचा उपाय आहे, असं टोपे म्हणाले.

मागे

आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती
आयकर रिटर्न भरण्याची मुदत वाढवावी, मुख्यमंत्र्यांची केंद्रीय अर्थमंत्र्यांना विनंती

आर्थिक वर्ष 2018-19 चे सुधारित आणि उशिराचे आयकर रिटर्न भरण्याची 31 मार्चची मुदत व....

अधिक वाचा

पुढे  

रत्नागिरीत कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे
रत्नागिरीत कोरोना रुग्णाची तपासणी करणाऱ्या महिला डॉक्टरलाच कोरोनाची लक्षणे

कोरोना विषाणुने जगभरात थैमान घातले आहे. महाराष्ट्रातही याची संख्या दिवसें....

Read more