ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: फेब्रुवारी 01, 2024 11:53 AM 2019-02-12T14:15:30+5:30

तरुणांनो तयारी सुरु करा, राज्यात पोलिसांच्या मेगा भरतीस मंजुरी

शहर : मुंबई

लोकसभेची निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. आता काही दिवसांत भरतीची जाहिरात येणार आहे.

राज्यातील तरुणांसाठी नवीन वर्षात चांगली बातमी आली आहे. राज्याच्या पोलीस भरतीची वाट पाहणाऱ्या युवकांना चांगली संधी मिळणार आहे. महाराष्ट्र पोलीस दलात 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. 2024 मध्ये ही मेगा भरती प्रक्रिया सुरु होणार आहे. राज्यात 70 वर्षांपूर्वीच्या आकृतीबंधानुसारच सध्या पोलीस दलातील मनुष्यबळ आहे. परंतु आता नवीन आकृतीबंध तयार केला गेला आहे. या आकृतीबंधानुसार भरती करण्यास वित्त विभागाकडून मंजुरी देण्यात आली आहे. यामुळे राज्यात तब्बल 17,471 पोलिसांची भरती केली जाणार आहे. पोलीस शिपाई, सशस्त्र पोलीस शिपाई, कारागृह शिपाई, पोलीस शिपाई चालक यापदांसाठी लवकरच जाहिरात निघणार आहे.

कंत्राटी भरतीवरुन अधिवेशनात वादळ

पोलीस दलात कंत्राटी भरती होत असल्याचा आरोप करत विरोधकांनी हिवाळी अधिवेशात सरकारवर जोरदार टीका केली होती. शिंदे-फडणवीस सरकार पोलीस दलात कंत्राटी भरती करण्याचा निर्णय घेत असल्याचा आरोप विरोधकांनी केला होता. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांचा हा आरोप फेटाळून लावला. तसेच नवीन आकृतीबंधानुसारच राज्यात पोलीस भरती होणार असल्याचे सांगितले. जिल्ह्यांमधील गावांची गरज ओळखून नवीन पोलीस ठाणेही मंजूर केले गेली असल्याचे त्यांनी म्हटले होते.

पोलीस दलात 100 टक्के भरती

राज्य सरकारच्या इतर विभागांना फक्त 50 टक्के पदांची भरती करता येते. परंतु हा नियम पोलीस दलासाठी अपवाद ठरला आहे. राज्याच्या पोलीस दलात 100 टक्के पदभरतीला मान्यता दिली आहे. यामुळे आता 17,471 पदांसाठी भरतीची जाहिरात निघणार आहे. मागील वर्षी राज्यात 23 हजार पोलिसांची भरती करण्यात आली होती. त्या भरतीचे प्रशिक्षण राज्यातील दहा केंद्रांमध्ये सुरु आहे. हे प्रशिक्षण या महिन्यात संपणार आहे. यामुळे आता नवीन भरतीची प्रक्रिया सुरु होत आहे.

लोकसभेच्या आचारसंहितेपूर्वी प्रक्रिया

लोकसभेची निवडणूक आचारसंहिता मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागण्याची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आचारसंहितेपूर्वी पोलीस भरतीची प्रक्रिया सुरु करण्यासाठी हालचाली सुरु झाल्या आहे. आता काही दिवसांत भरतीची जाहिरात येणार आहे.

 

मागे

भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार
भारत 2047 पर्यंत विकसित देश कसा बनणार ? अर्थमंत्र्यांनी सांगितले कसे काम करणार

भारताला 2047 विकसित राष्ट्र बनवण्यासाठी पारदर्शन पद्धतीने काम सुरु आहे. देशा....

अधिक वाचा

पुढे  

लोकसंख्या वाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ही आश्चर्यकारक घोषणा
लोकसंख्या वाढीवर अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली ही आश्चर्यकारक घोषणा

केंद्र सरकारने लोकसंख्या नियंत्रण आणि लोकसंख्या बदलाचे मूल्यांकन करण्यास....

Read more