ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

By SHEETAL CHAVAN | प्रकाशित: जुलै 24, 2019 11:23 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईत अतिवृष्टीचा इशारा

शहर : मुंबई

गेले काही दिवस विश्रांती घेतलेल्या पावसाने मंगळवारी रात्रीपासून मुंबईसह उपनगराला झोडपून काढले, त्यामुळे दादर शिवडी परळ सायन चेंबूर गोवंडी मानखुर्द मध्येही पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा करण्यासाठी कर्मचारी रात्रभर काम करताना दिसून आले सायनमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आले. मध्य व हार्बर रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाली आहे. हार्बर मार्गावर 15 ते 20 मिनिटे तर मध्य रेल्वेमार्गावर दहा ते पंधरा मिनिटे गाड्या उशिराने धावत आहेत, त्यामुळे सकाळी कामावर जाणाऱ्या कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली आहे. 

ठीक ठिकाणी रस्त्यावर पाणी साचल्याने अनेक खासगी वाहने बंद पडली सायन ते सीएसटी दरम्यान ठिकाणी रेल्वे रुळांवर पाणी साचलं रात्रभर वसई-विरार लाही पावसाने झोडपले. मुंबईत कुलाब्यामध्ये गेल्या बारा तासात 171 मी तर सांताक्रुझमध्ये 58 मिमी पावसाची नोंद झाली. कुलाब्यात दोन तासात 52 मिमी पाऊस कोसळला, दरम्यान येत्या 24 तासात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला.

 

मागे

अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका
अतिवृष्टीचा गणपतीपुळे देवस्थानला फटका

रत्नागिरीला काल मुसळधार पावसाने झोडपून काढले. या अतिवृष्टीचा गणपतीपुळे दे....

अधिक वाचा

पुढे  

बेस्ट खास महिलांसाठी तेजस्विनी धावणार
बेस्ट खास महिलांसाठी तेजस्विनी धावणार

मुंबईत खास महिलांसाठी बेस्ट प्रशासनातर्फे येत्या तीन महिन्यात तेजस्विनी ....

Read more