ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणी मालकांना दिलासा, सर्व आरोपातून दोषमुक्त

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: नोव्हेंबर 11, 2020 10:57 AM 2019-02-12T14:15:30+5:30

मुंबईतील कमला मिल अग्नितांडव प्रकरणी मालकांना दिलासा, सर्व आरोपातून दोषमुक्त

शहर : मुंबई

2017 च्या कमला मिल अग्नितांडव प्रकरणी कमला मिलचे मालक रमेश गोवानी आणि रली भंडारी यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना या प्रकरणातून दोषमुक्त केलं आहे. या दोघांविरोधात एमआरटीपी कायद्याचे उल्लंघन करणे, बेकायदेशीर कामास मदत करणे, इतरांच्या मृत्यूस कारणीभूत होणे अशा विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता. याच प्रकरणात इतर आरोपींची याचिका फेटाळून त्यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा खटला चालवण्याची परवानगी कोर्टाने दिली आहे.

मात्र घडलेल्या दुर्घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा या दोघांनी दोषमुक्तीसाठी अर्ज केला होता. ही घटना घडली तेव्हा आपण तिथं प्रत्यक्ष उपस्थित नव्हतो. तिथल्या दैनंदिन कामकाजाशी आपला काहीही संबंध नाही. 'वन अबव्ह' आणि 'मोजोस ब्रिस्ट्रो' या दोन्ही जागा 5 वर्षांच्या भाडेत्त्वावर दिलेल्या होत्या. या जागेत सुरु असलेल्या पब्ज रेस्टॉरंटसाठीचे सर्व परवाने हे महापालिका प्रशासनाने दिलेले आहेत. मद्यसेवनाचे परवाने राज्य सरकारने दिलेले आहेत. अग्निसुरक्षा संबंधिचा परवानाही मुंबई अग्निशमन दलाच्यावतीने देण्यात आला आहे. त्यामुळे या घटनेशी आपला काहीही संबंध नाही असा दावा गोवानी आणि भंडारी यांनी केला होता.

यात मोजोस ब्रिस्टोचे मालक-संचालक युग पाठक, युग टुली, वन अबव्हचे मालक-संचालक जिगर संघवी, क्रिपेश संघवी, अभिजीत मानकर यांच्याविरुद्ध मुंबई पोलिसांनी स्वतंत्र गुन्हे दाखल केले आहेत. एमआरटीपी अंतर्गत महापालिकेच्या तक्रारीवरुन हा एफआयआर दाखल केला होता. तसेच आपल्या कर्तव्यात कसूर करणाऱ्या वन अबव्हचा मॅनेजर केविन बावा आणि लिस्बन लोपेज, वरळी अग्निशमन दलाचे अधिकारी राजेंद्र पाटील, संदीप शिंदे आणि महापालिकेच्या 'जी' वॉर्डचे अधिकारी दिनेश महाले यांच्याविरोधात सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्निविरोधक यंत्रणेचा वापर न करणं या आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, त्यावर हा खटला चालवण्यात येणार आहे.

29 डिसेंबर 2017 च्या रात्री कमला मिल कम्पाउंडमधील वन अबव आणि मोजेस ब्रिस्टो या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे. ना म जोशी मार्ग पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मागे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मानले बिहारच्या जनतेचे आभार

बिहार विधानसभा निवडणुकीच्या निकालाबाबत पंतप्रधान मोदींनी बिहारच्या जनत....

अधिक वाचा

पुढे  

नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद
नरेंद्र पाटील यांची 'या' महामंडळावरुन हकालपट्टी, कांदा-बटाटा-मसाला मार्केट बंद

येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये माथाडी कामगारांनी (Mathadi workers) बंद पुकारला ....

Read more