ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: सप्टेंबर 15, 2020 11:11 AM 2019-02-12T14:15:30+5:30

केंद्र सरकारकडून कांदा निर्यातबंदी, कांद्याचे भाव कोसळले

शहर : मुंबई

केंद्र सरकारने निर्यातीसाठी पाठवलेला कांदा मुंबई पोर्ट आणि बांग्लादेश बॉर्डरवर रोखून धरल्याने कांदा कोंडी निर्माण झाली आहे. कांद्याचे भाव २६०० ते २७०० रुपयांपर्यंत खाली कोसळलेत. तर मुंबई बंदरातून निर्यातीसाठी निघालेला ४०० कंटेनर कांदा सडण्याची भीती व्यक्त होत आहे. नाशकात कांद्याचे भाव कोसळल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे.

या अघोषित निर्यात बंदीमुळे कांद्याच्या बाजारभावात पाचशे ते सहाशे रुपयांची घसरण झाल्याने कांदा उत्पादकांना फटका बसला यामुळे संतप्त झालेल्या महाराष्ट्र राज्य कांदा उत्पादक शेतकरी संघटनेने तत्काळ निर्यात पूर्ववत सुरू करण्याची मागणी केली आहे.

केंद्र सरकारने कांद्यावर निर्यातबंदीचा निर्णय घेतला आहे. ही निर्यातबंदी तातडीने लागू करण्याचं परिपत्रक काढण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांत कांद्याचे दर वाढू लागले होते. दर नियंत्रणात ठेवण्यासाठी केंद्राने तातडीने ही निर्याबंदी लागू केली आहे. कांद्याचे दर वाढत आहेत. कांदा पुन्हा रडवणार अशी स्थिती दिसून येत आहे. देशभरात आवक कमी झाल्यामुळे कांदा दरात दररोज वाढ होत आहे. गेल्या एका आठवड्यात कांद्याच्या भावात चांगलीच वाढ झाली आहे. नाशिकमध्ये चांगल्या प्रतीच्या कांद्याचा दर वाढलेला दिसून येत आहे. वाढते दर रोखण्यासाठी केंद्रसरकारकडून ही निर्यात बंदी करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.तर दुसरीकडे केंद्रानं निर्यातबंदी उठवल्यानंतर कांदा उत्पादक शेतकऱ्यांना दोन पैसे मिळू लागले होते. मात्र केंद्र सरकारने निर्यातबंदीचा निर्णय़ घेतल्यामुळे आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कांदा पुन्हा रडवण्याची शक्यता आहे.

मागे

मराठा आरक्षण : कोल्हापूरमध्ये २३ सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद
मराठा आरक्षण : कोल्हापूरमध्ये २३ सप्टेंबरला राज्यव्यापी गोलमेज परिषद

मराठा आरक्षणासाठी २३ सप्टेंबरला कोल्हापूरमध्ये राज्यव्यापी गोलमेज परिषद....

अधिक वाचा

पुढे  

गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,८०९ नवे रुग्ण; भारताने ४९ लाखांचा टप्पा ओलांडला
गेल्या २४ तासांत कोरोनाचे ८३,८०९ नवे रुग्ण; भारताने ४९ लाखांचा टप्पा ओलांडला

गेल्या २४ तासांत देशभरात कोरोना व्हायरसच्या ८३,८०९ नव्या रुग्णांची नोंद झा....

Read more