By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑक्टोबर 14, 2019 07:49 PM 2019-02-12T14:15:30+5:30
शहर : मुंबई
भारतीय रिझर्व्ह बँकेने सोमवारी पंजाब आणि महाराष्ट्र सहकारी (पीएमसी) बँकेतून पैसे काढण्याच्या मर्यादेत वाढ केली. त्यामुळे आता खातेधारकांना दिवसाला बँकेतून ४० हजार रुपये काढता येतील. यापूर्वी ही मर्यादा २५ हजार इतकी होती.काही दिवसांपूर्वी पीएमसी बँकेत मोठा गैरव्यवहार झाल्याचे उघड झाले होते. यानंतर रिझर्व्ह बँकेने पीएमसीवर आर्थिक निर्बंध लादले होते. त्यामुळे पीएमसीला रिझव्र्ह बँकेच्या परवानगीशिवाय कर्ज वितरणाला, नवीन गुंतवणूक करण्याला किंवा निधी मिळवून दायित्व वाढविता येणार नाही. त्याचप्रमाणे नव्याने ठेवी स्वीकारण्याला, तसेच ठेव वठविणे, देणी चुकती करण्याला आणि आपल्या कोणत्याही स्थावर मालमत्ता व संपत्तीची विक्री, हस्तांतरण किंवा अन्य मार्गाने विल्हेवाटीवर बंदी आली आहे.
पूर्व द्रुतगती मार्ग आणि ऐरोलीला जोडणाऱ्या लिंक रोडवर खड्ड्यांमुळे आणखी ए....
अधिक वाचा