ठळक बातम्या कोलेस्टेरॉलची टेस्ट कधी करावी, कंट्रोलमध्ये कसं ठेवताल? जाणून घ्या.    |     ब्लड शुगर नियंत्रणात आणतात ही हिरवी पाने, जाणून घ्या कसे करावे सेवन.    |     पपईसोबत कधीच खाऊ नयेत ही फळे, अन्यथा गाठावे लागू शकते हॉस्पिटल.    |     नव्या वर्षात अंगी बाणवा ‘या’ सवयी, आजार पळतील दूर….    |     जास्त मीठ खाताय तर हे आजार झालेच समजा, वेळीच सावध व्हा अन्यथा जावू शकतो जीव.    |    

पंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक

By DAYANAND MOHITE | प्रकाशित: ऑगस्ट 18, 2020 10:56 AM 2019-02-12T14:15:30+5:30

पंचगंगेने पुन्हा इशारा पातळी ओलांडली, कोल्हापुरात धाकधूक

शहर : कोल्हापूर

सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची उघडझाप सुरु आहे.सध्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर ओसरला असला तरी, दोन्ही जिल्ह्यातील धरणं ओव्हरफ्लो झाली आहेत. त्यासोबत कोल्हापुरातील पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. त्यामुळे कोल्हापूरकरांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे. तसेच सांगलीतील कृष्णा नदीच्या पाणी पातळीतही वाढ होऊन 38 फूट झाली आहे.

कोयना धरणातून नदी पात्रात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी अजुन वाढली आहे. सांगली शहराजवळ कृष्णा नदीची पाणी पातळी 38 फुटांवर पोहोचली आहे. तर पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. पंचगंगा नदीची पाणीपातळी 39 फूट आठ इंचावर पोहोचली आहे.

कोल्हापुरातील शहर परिसरात पावसाची उघडझाप तर धरणक्षेत्रातील पावसाचा जोर ओरसला आहे. राधानगरी धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे बंद झाले आहेत. त्यामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. सध्या दोन दरवाजामधून 4 हजार क्यूसेक्सचा विसर्ग भोगावती नदीमध्ये सुरू आहे. गेल्या दोन दिवसापासून चार दरवाजांमधून सात हजार क्यूसेक्सचा विसर्ग सुरु होता. राधानगरी धरणातील पाण्याच्या विसर्गामुळे भोगावती आणि पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील 95 बंधारे पाण्याखाली गेली आहेत. खबरदारी म्हणून आंबेवाडी, प्रयाग चिखली गावातील लोकांच स्थलांतर करण्यात आले आहे.

सांगली शहरातील सूर्यवंशी प्लॉट, आरवडे प्लॉट, साईनाथकॉलनी, दत्तनगर, इनामदार प्लॉट येथील 200 लोक स्थलांतरित केले आहेत. येथील लोकं स्वतःहून अन्य ठिकाणी राहण्यास गेले आहेत. सांगली महापालिकेच्या निवारा केंद्रात 36 लोकं स्थलांतरित झाले आहेत.

मागे

Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास 'नो एन्ट्री', मुंबई पालिकेकडून नियमावली ज
Ganeshotsav 2020 | यंदा गणेशमूर्तींचे संकलन, थेट विसर्जनास 'नो एन्ट्री', मुंबई पालिकेकडून नियमावली ज

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्याचे आ....

अधिक वाचा

पुढे  

मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन
मी स्वत: घरी येईन भेटायला, मनसैनिकाच्या आत्महत्येनंतर राज ठाकरेंचा फोन

नांदेड जिल्ह्यातील किनवटमधील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे शहराध्यक्ष सुन....

Read more